Dayanand Education Society's

Dayanand Science College, Latur

Affiliated to Swami Ramanand Teerth Marathwada University, Nanded

NAAC A+ with 3.40 CGPA, Shahu - Fule - Ambedkar Maharashtra Govt Award, UGC - College With Potential for Excellence, Best College Award by SRTMUN, DST - FIST Recognised College, Microsoft’s Showcase College and Microsoft Innovative College, First prize in Energy Conservation at National Level

NAAC A+ with 3.40 CGPA

News and Events

लातूर : येथील दयानंद विज्ञान महाविद्यालयातील एम.एस्सी.रसायनशास्त्र द्वितीय वर्षातील निरंजन विजयकुमार बनसुडे या विद्यार्थ्यांनी राजर्षी  शाहू महाविद्यालय (स्वायत्त),लातूर येथे ‘ उदयोन्मुख भौतिक रसायनशास्त्र आणि आव्हाने ‘ या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेतील पोस्टर प्रेझेंटेशनमध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळविले.
        त्याच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयप्रकाश दरगड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.याप्रसंगी रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ.युवराज सारणीकर,डॉ.जमन अनगुलवार,डॉ.श्याम इबाते, डॉ.आण्णाराव चौगुले,डॉ.नाथराव केदार,डॉ.नंदिनी कोरडे,डॉ.रवींद्र शिंदे,डॉ.श्रेयस माहुरकर, प्रा.राहुल जाधव,प्रा.बळीराम कमाळे,प्रा.नवनाथ ढेकणे, प्रा. जे.आर.तांबोळी,प्रा.अक्षता माने, प्रा.मनीषा मुंडे,प्रा.भाग्यश्री काळे,प्रा.युसुफ पठाण,माळगे एम.आर.,जोशी एल.बी.,महेश आकिनगीरे,शंकर सूर्यवंशी,प्रसाद मोरे यांच्यासह प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी उपस्थित राहून त्याचे अभिनंदन व कौतुक केले.
लातूर : येथील दयानंद विज्ञान महाविद्यालयास दि.14 व 15 मार्च 2022 रोजी राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद अर्थात नॅक पिअर टीमने भेट देऊन मूल्यांकन केले.या नॅक पिअर टीममध्ये अध्यक्ष म्हणून मध्यप्रदेश,रेवा येथील एपीएस विद्यापीठाचे कुलगुरू प्रो.आर.एम.मिश्रा,सदस्य समन्वयक म्हणून आसाम,डीयू राजाभेटा दिब्रुगढ येथील सुरजित कुमार घोष,सदस्य म्हणून तामिळनाडू,कन्याकुमारी येथील एमएसयूसीसीचे प्राचार्य डॉ.मर्फी अलेक्झांडर आणि निरीक्षक म्हणून कर्नाटक,तुमकुर विद्यापीठ,तुमकुर येथील प्रो.बी.के.सुरेश या चौघांचा समावेश होता.
        दयानंद विज्ञान महाविद्यालयाचे हे तिसरे नॅक मूल्यांकन असून यामध्ये संख्यात्मक आणि विश्लेषणात्मक अशा दोन टप्प्यांमध्ये नॅक मूल्यांकन यशस्वीरित्या पूर्ण झाले.त्यातील 70 टक्के संख्यात्मक माहिती नॅकला महाविद्यालयाने अगोदरच सादर केली आहे.उर्वरित 30 टक्के विश्लेषणात्मक मूल्यांकन या चार सदस्यीय समितीने केले आहे आणि तसा अहवालही नॅकला पाठविलेला आहे.या दोन दिवसाच्या मूल्यांकनामध्ये नॅक पिअर टीमने प्राचार्याचे प्रेझेंटेशन, विभागप्रमुखांची बैठक,सुसंवाद,सर्व विभागांना भेटी,पीपीटी प्रेझेंटेशन,कागदपत्र फाईल्सची तपासणी,आजी-माजी विद्यार्थी आणि पालकांची बैठक,ग्रंथालय,मुला-मुलींचे वस्तीगृह,क्रिकेट ग्राऊंड,विविध मंडळे,सांस्कृतिक कार्यक्रम,राष्ट्रीय सेवा योजना,राष्ट्रीय छात्र सेना,संस्था व कार्यालयाला भेट,लॅग्वेज लॅब,महाविद्यालयाची सुसज्ज इमारत,विद्यार्थ्यांना पुरवण्यात येणाऱ्या सुविधा,संशोधन,
गुणवत्तावाढीसाठी राबविले जाणारे विविध उपक्रम,कार्यशाळा आदी बाबींचे सर्वांगीण दृष्टिकोनातून सूक्ष्म तपासणी,पाहणी करून मूल्यांकन केले.या समितीतील अध्यक्ष,समन्वयक,समन्वयक सदस्य आणि निरीक्षक यांनी एक्झिट मिटिंगमध्ये आपले विचार मांडताना दयानंद विज्ञान महाविद्यालय आणि दयानंद शिक्षण संस्थेचे भरभरून कौतुक केले.
       महाविद्यालयाचे नॅक यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयप्रकाश दरगड,उपप्राचार्य व आयक्यूएसीचे समन्वयक डॉ. सिद्धेश्वर बेल्लाळे आणि नॅक  समन्वयक डॉ.रवींद्र सोळुंके,कार्यालयीन अधीक्षक राजेश सेलूकर तसेच महाविद्यालयाचे आजी-माजी विद्यार्थी,पालक,प्राध्यापक,सर्व विभाग प्रमुख,शिक्षकेत्तर कर्मचारी या सर्वांनी कठोर परिश्रम घेतले.महाविद्यालयाच्या नॅकसाठी दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमणजी लाहोटी, उपाध्यक्ष अरविंदरावजी सोनवणे, सचिव रमेशजी बियाणी,संयुक्त सचिव सुरेशजी जैन आणि सर्व पदाधिकाऱ्यांचे नेहमीच सहकार्य लाभले.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयप्रकाश दरगड,उपप्राचार्य सिद्धेश्वर बेल्लाळे,नॅक समन्वयक डॉ.रवींद्र सोळुंके,दयानंद शिक्षण संस्था,संस्थेतील सर्व प्राचार्य आणि सर्वांना महाविद्यालयाला चांगला ग्रेड मिळेल अशी अपेक्षा आहे.
लातूर : येथील दयानंद विज्ञान महाविद्यालयातील रसायनशास्त्र व औद्योगिक रसायनशास्त्र मंडळाद्वारा दि.11 मार्च 2022 रोजी रसायनशास्त्र रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या रांगोळी स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.सिद्धेश्वर बेल्लाळे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.याप्रसंगी रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ.युवराज सारणीकर,रांगोळी स्पर्धा समन्वयक डॉ.नंदिनी कोरडे,औद्योगिक रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ.आण्णाराव चौगुले,डॉ.चंद्रशेखर स्वामी यांची प्रमुख उपस्थिती होती.
         सदरील स्पर्धेमध्ये एकूण 35 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविलेला होता,त्यात 2 मुलांचाही सहभाग होता.या स्पर्धेत नम्रता आदतराव व सीमा ठाकूर यांनी प्रथम क्रमांक तर प्रतीक्षा सुपेकर,सय्यद उझ्मा व प्रतिक्षा दळवे यांनी द्वितीय क्रमांक आणि पृथ्वी सोनवणे, अंकिता वाघमारे व आकांक्षा भोसले यांनी तृतीय क्रमांक मिळविला.तसेच अनिकेत जाधव व अनिकेत धमाळे,ऋतुजा खोडसे व हर्षदा शिंदे,प्रतिक्षा मोरे व पुजा जाधव,मानसी जोशी या सर्वांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले.या स्पर्धेसाठी प्रा.अक्षता माने,प्रा.भाग्यश्री काळे,प्रा.प्रज्ञा खांडके,प्रा.मनीषा मुंडे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.या रांगोळी स्पर्धेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयप्रकाश दरगड, डॉ.श्याम इबाते,डॉ.जमन अंगुलवार,डॉ.रवींद्र शिंदे,डॉ‌‌.श्रेयस माहुरकर,डॉ.एन.ए.केदार, प्रा‌.राहुल जाधव यांचेही सहकार्य लाभले‌.याप्रसंगी प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि रांगोळी स्पर्धेतील सहभागी विद्यार्थी,विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.
लातूर : येथील दयानंद विज्ञान महाविद्यालयातील संगणकशास्त्र विभाग व असोसिएशन मिरर टेक्नॉलॉजीज,पुणे आणि संस्था इनोव्हेशन कौन्सिल ( शिक्षण मंत्रालय इनिशिएटिव्ह ) यांच्या संयुक्त विद्यमाने  ‘ पायथाॅनसह डेटा सायन्स ‘ या विषयावर दि.11 मार्च ते 20 मार्च 2022 या दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या ट्रेनिंग प्रोग्रामचे उद्घाटन उद्घाटक सीटीओच्या कॉर्पोरेट प्रशिक्षण आणि सल्लागार कलाश्री एस. या प्रमुख पाहुण्याच्या उपस्थितीत झाले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.सिद्धेश्वर बेल्लाळे होते.याप्रसंगी संगणकशास्त्र विभाग प्रमुख डॉ.रोहिणी शिंदे, डॉ.ललित ठाकरे,समन्वयक प्रा. संगीता जाजू,डॉ.श्रेयस माहुरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
       याप्रसंगी कलाश्री असे म्हणाल्या की,डेटा सायन्समध्ये विद्यार्थ्यांना खूप संधी आहेत.पायथाॅनसह डेटा सायन्सचे थेअरी आणि प्रॅक्टिकली ज्ञान असले पाहिजे.या दहा दिवसीय ट्रेनिंग प्रोग्राममधील अद्ययावत ज्ञान घेऊन भविष्यात या क्षेत्रात करिअर करावे असे त्या म्हणाल्या.
        अध्यक्षीय समारोप करताना उपप्राचार्य डॉ.सिद्धेश्वर बेल्लाळे यांनी सध्याचे युग संगणकशास्त्राचे युग असून या युगात विद्यार्थ्यांनी बदलत्या काळानुसार संगणकाचे ज्ञान,संगणकाची लॅग्वेज आदिंचे ज्ञान घेतले पाहिजे.या दहा दिवसीय प्रोग्राममधील ज्ञानाचा फायदा घेऊन विद्यार्थी निश्चितच स्वतःच्या पायावर उभे राहतील अशी अपेक्षा व्यक्त केली.
         प्रास्ताविक डॉ.रोहिणी शिंदे यांनी केले तर आभार प्रा.के.एस.सारडा यांनी मानले.सूत्रसंचालन शिवाणी पेटकर यांनी केले.प्रमुख पाहुण्याचा परिचय प्रा.संगीता जाजू यांनी करून दिला.शिवाणी पेटकर व विराज भीमपुरे या दोन विद्यार्थ्यांनी पुस्तके भेट दिली.प्राचार्य डॉ.जयप्रकाश दरगड यांचेही मार्गदर्शन या दहा दिवसीय ट्रेनिंग प्रोग्रामसाठी आहे.याप्रसंगी प्रा.सुजाता काळे,प्रा.व्ही.जी.कुलकर्णी, प्रा.एन.आर. शिंदे,प्रा.एम.बी.सुगरे,प्रा.एस.टी. चिकराळे,डॉ.रामशेट्टी शेटकार आदि प्राध्यापक,शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
लातूर : येथील दयानंद विज्ञान महाविद्यालयातील युवती कल्याण मंडळातर्फे 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त  “हॅन्ड फाॅर हर ” या विषयांतर्गत युवती कल्याण मंडळाच्या मुलीनी स्वयंसिद्धा संस्थेतील मुलींसाठी कार्यक्रम आयोजित केला होता.यावेळी संस्थेच्या संस्थापक ॲड.स्मिता परचुरे,सौ.दुरुककर,सौ.बागल आणि त्याचे महिला सहकारी तसेच दयानंद विज्ञान महाविद्यालयातील युवती कल्याण मंडळाच्या प्रभारी प्रा.शितल पाटील,डॉ.मनीषा गुरमे तसेच युवती कल्याण मंडळाचे पदाधिकारी मंजुषा नाईकवाडी,प्रतिक्षा मोरे, गौरवी जाधव,गौरी कन्हेरे,विदुला राजमाने,अंजली शेंडगे,मोनिका मुसळे,राणी सुरवसे,श्रुती पवार,पल्लवी कोकरे  उपस्थित होते.खेळणी,पुस्तके,पेन,वह्या,
पेन्सिल,त्यांच्यासाठी उपयुक्त असणाऱ्या वस्तू व खाऊ वाटप करण्यात आला.यासाठी युवती कल्याण मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि दयानंद विज्ञान महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थ्यांकडून निधी गोळा केला होता.मनोरंजन म्हणून नृत्य व गायनाचा कार्यक्रमही घेण्यात आला.खेळीमेळीच्या व आनंदमयी वातावरणात  कार्यक्रम पार पडला.यावेळी सौ.परचुरे यांनी त्यांच्या संस्थेबद्दल माहिती दिली.महिलांना किती संकटाना सामोरे जावे लागते,त्यामुळेच महिलांनी खूप शिकावे आणि मोठे व्हावे,असे त्यांनी सांगितले.डॉ.मनीषा गुरमे यांनी प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले.प्रास्ताविक युवती कल्याण मंडळाचे समन्वयक प्रा.शितल पाटील यांनी केले.सूत्रसंचलन मनीषा नाईकवाडे यांनी केले.हा कार्यक्रम घेण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयप्रकाश दरगड व उपप्राचार्य डॉ.सिद्धेश्वर बेल्लाळे यांचेही प्रोत्साहन मिळाले.
लातूर : येथील दयानंद विज्ञान महाविद्यालयातील भाषा विभागाच्या वतीने दि.8 मार्च 2022 जागतिक महिला दिन व 27 फेब्रु.मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने मिसबाह पटेल, निकिता सोनकांबळे,स्नेहा सोनकांबळे,सायली गरड, निकिता सुडे,सायमा शेख, संतोषी हसाळे, योगेश्वरी लामतूरे, आदिती शिंदे,सुजाता सराफ,अशोक गुटलकर या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या आणि मराठी,हिंदी व इंग्रजी साहित्यातील मराठी लेखिकांवर व कवी कुसुमाग्रज यांच्या जीवनकार्यावर प्रकाशझोत टाकणाऱ्या भित्तिपत्रकाचे विमोचन प्राचार्य डॉ.जयप्रकाश दरगड यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी उपप्राचार्य डॉ.सिद्धेश्वर बेल्लाळे,इंग्रजी विभाग प्रमुख प्रा.मेघा पंडित,हिंदी विभाग प्रमुख डॉ.गजानन बने,मराठी विभाग प्रमुख डॉ.रामशेट्टी शेटकार,प्रा.विद्या गिराम,डॉ.मनीषा गुरमे यांची प्रमुख उपस्थिती होती.
      प्राचार्य डॉ.जयप्रकाश दरगड असे म्हणाले की,मराठी,हिंदी आणि इंग्रजी साहित्याचे दालन अत्यंत समृद्ध असून या साहित्यामध्ये महिला लेखिकांचे उल्लेखनीय योगदान आहे आणि त्यांनी दर्जेदार अशा साहित्याची निर्मिती केलेली आहे.प्रत्येक विद्यार्थ्यांनी,मुला-मुलींनी या महिलांचा आदर्श घेऊन भावी जीवनाची वाटचाल करावी,असे ते म्हणाले.महिला दिनाच्याही शुभेच्छा त्यांनी दिल्या. भित्तिपञक तयार केलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी लेखिकांबद्यल माहिती सांगितली. 
     याप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक,शंकर भालके यांच्यासह शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
लातूर : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ,नांदेड अंतर्गत आंतरविभागीय आंतर महाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धेचे आयोजन दि. 2 ते 4 मार्च या कालावधीमध्ये करण्यात आले.या स्पर्धेत विद्यापीठातील चार विभागाच्या संघांनी सहभाग नोंदविला.ही स्पर्धा साखळी पद्धतीने खेळवण्यात आली.या स्पर्धेचे उद्घाटन दयानंद शिक्षण संस्थेचे सचिव रमेश बियाणी यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी प्राचार्य डॉ.जे.एस.दरगड,अजिंक्य सोनवणे,प्रा.महेश बेंबडे,प्रा.मीनानाथ गोमसाळे,प्रा.संतोष कोकीळ,प्रा. चरणजीतसिंह महाजन,प्रा.निशिकांत सदाफुले इत्यादी उपस्थित होते.या स्पर्धेमध्ये ब विभागाच्या संघाने तृतीय क्रमांक प्राप्त केला तर ब विभागाच्या संघाने द्वितीय स्थान प्राप्त केला.या स्पर्धेत अ विभागाला विजेतेपद प्राप्त केले. सदरील स्पर्धेमधून विद्यापीठाचा संघ निवडण्यात आला,हा संघ आंतर विद्यापीठ क्रिकेट स्पर्धेमध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणार आहे.या स्पर्धेचे बक्षीस वितरण प्राचार्य डॉ.जे.एस.दरगड यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी प्रा.भारत चामले,सिकंदर पटेल,श्रीनिवास इंगोले,सुधीर बाजूळगे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.या स्पर्धा यशस्वी करण्याकरिता प्रा.महेश बेंबडे,प्रा.निशिकांत सदाफुले,प्रा.ऋषिकेश मस्के,विकास निरपळ इत्यादींनी प्रयत्न केले.
लातूर : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ,नांदेड व दयानंद वाणिज्य महाविद्यालय लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विद्यापीठस्तरीय आंतरमहाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धचे आयोजन दि.1 मार्च 2022 रोजी करण्यात आले.या स्पर्धेमध्ये दयानंद विज्ञान महाविद्यालयाच्या मुलीच्या संघाने सर्वप्रथम क्रमांक प्राप्त केला. तसेच एस.जी.जी.एस.
इंजिनिअरिंग कॉलेज,नांदेड या संघाने द्वितीय क्रमांक प्राप्त केला, तर एन.सी.लॉ कॉलेज,नांदेडच्या संघाला तृतीय क्रमांकावर समाधान मानावे लागले.दयानंद विज्ञान महाविद्यालयाच्या विजयी संघात आनंदी पांचाळ,पूजा जाधव,आरती मोटेगावकर व आकांक्षा भोसले या विद्यार्थिनींचा समावेश होता.विजयी संघातील खेळाडूंचा महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.याप्रसंगी दयानंद शिक्षण संस्थेचे सरचिटणीस रमेश बियाणी,प्राचार्य डॉ.जे.एस.दरगड,अजिंक्य सोनवणे,प्रा.महेश बेंबडे,प्रा.निशिकांत सदाफुले व प्रा.ऋषिकेश मस्के इत्यादी उपस्थित होते.
लातूर: येथील दयानंद विज्ञान महाविद्यालय आणि मायक्रोबायोलॉजी सोसायटी ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय विज्ञान दिवसानिमित्त “*सूक्ष्मजीवशास्त्रातील प्रगती* “या विषयावर दि.28 फेब्रुवारी व 01 मार्च 2022 रोजी दोन दिवसीय राष्ट्रीय वेबिनार ऑनलाईन पद्धतीने संपन्न झाले .याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष दयानंद विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जे.एस.दरगड,मायक्रोबायोलॉजी सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष प्रा.ए.एम.देशमुख,सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ.आर.ए.मोरे,कार्यशाळा समन्वयक प्रा.शैलजा धुतेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
          याप्रसंगी प्रमुख पाहुणे डॉ.ए.एम.देशमुख यांनी वर्तमान परिस्थितीत सूक्ष्मजीवशास्त्र या विषयावर मार्गदर्शन करताना जैवखत,जैवकीटकनाशके,जैवशास्त्र,औषध क्षेत्र यामध्ये सूक्ष्मजीव कसे उपयोगी आहेत ते समजावून सांगितले.सूक्ष्मजीव वर्तमान परिस्थितीत कशाप्रकारे महत्त्वाची भूमिका बजावतात ते स्पष्ट केले.
            दयानंद विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जे.एस.दरगड यांनी सूक्ष्मजीवशास्त्र विषयात दयानंद विज्ञान महाविद्यालयाची भूमिका व राष्ट्रीय पातळीवर असलेले योगदान प्रभावीपणे मांडले.कार्यशाळेचे प्रास्ताविक विभाग प्रमुख डॉ.आर.ए.मोरे यांनी केले.याप्रसंगी मान्यवर व्यक्ती डॉ.अरुण खरात यांनी सूक्ष्मजीवशास्त्रात नॅनो टेक्नॉलॉजीचा वापर या विषयावर आपले अभ्यासू मत प्रभावीपणे मांडले.डॉ.डी.व्ही.वेदपाठक यांनी सूक्ष्मजीवांचा शेतीशास्त्रात उपयोग या विषयावर सखोल मार्गदर्शन केले.डॉ.बी.एस.नागोबा  यांनी कोरोना संसर्गात प्रतिकार क्षमतेचे महत्त्व अतिशय उत्कृष्टरित्या मांडले.डॉ.गिरीश कुकरेजा यांनी सूक्ष्मजीवशास्त्रांचा परस्पर संवादाचा शोध या विषयावर अतिशय रंजकपणे चर्चा केली.डॉ.एच.जे.भोसले यांनी सूक्ष्मजीवशास्त्रातील बायोसर्फॅक्टांट आणि त्यांचे उपयोग हा विषय अतिशय सोप्या पद्धतीने समजावून सांगितला.या राष्ट्रीय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.पूजा सोनसाळे यांनी केले.पाहुण्यांचा परिचय प्रा.शैलजा धुतेकर व डॉ.महेश काळे यांनी करून दिला.
समारोप कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा.शितल पाटील यांनी केले.कार्यक्रमाची तांत्रिक बाजू संगणकशास्त्र विभाग प्रमुख डॉ.रोहिणी शिंदे व प्रा.पूजा सोनसाळे यांनी सांभाळली.याप्रसंगी सर्व सूक्ष्मजीवशास्त्र व जैवतंत्रज्ञान विभागातील प्राध्यापकांनी तसेच राष्ट्रीय स्तरावरील इतर मान्यवर प्राध्यापकांनी व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
लातूर : 21 वे शतक हे विज्ञान-तंत्रज्ञानाचे असून या युगात विद्यार्थ्यांनी विज्ञानतंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील अद्ययावत ज्ञान,संकल्पना,सिद्धांत आणि प्रयोग समजून घेतले पाहिजेत.विज्ञानाबद्दल गोडी,आवड,प्रेम असले पाहिजे.कारण या विज्ञानाच्या साह्याने नवनवीन शोध लावून कोरोनासारख्या जागतिक समस्यांचा बिमोड लसीकरणाच्या माध्यमातून सहज करता येऊ शकतो.व्हॅक्सिनच्या साह्याने त्याला आळा घालता येऊ शकतो.याचबरोबर कॅन्सरसारख्या दुर्धर आजारावर बहुतांशपणे मात करता येऊ शकते,ही ताकद विज्ञानातच आहे.म्हणूनच त्याविषयी नवनवीन संशोधन केले पाहिजे.मोबाईल,फेसबूक, व्हाट्सअप,इंटरनेट आदिंचा दुरुपयोग न करता विद्यार्थ्यांनी विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन ठेवला पाहिजे,असे प्रतिपादन दयानंद शिक्षण संस्थेचे संचालक डॉ.चेतन सारडा यांनी केले.
        येथील दयानंद विज्ञान महाविद्यालयात विज्ञान मंडळाद्वारा दि.28 फेब्रु.2022 रोजी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त एक दिवसीय जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी ते समारोपप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयप्रकाश दरगड होते.याप्रसंगी उपप्राचार्य डॉ.सिद्धेश्वर बेल्लाळे,विज्ञान मंडळाच्या प्रभारी प्रा.श्वेता लोखंडे,प्रा.श्वेता मदने,विज्ञान मंडळाचा अध्यक्ष स्वरूप गावकरे,उपाध्यक्ष ऋषिकेश चांडक,इन्सिया पटेल यांची प्रमुख उपस्थिती होती.
       अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ.जयप्रकाश दरगड असे म्हणाले की,शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक जाणीवजागृती व्हावी आणि जयंत नारळीकर,रघुनाथ माशलकर,डॉ.सी.व्ही.रामन यासारख्या ख्यातनाम वैज्ञानिकांनी लावलेले शोध यांचा आदर्श विद्यार्थ्यांमध्ये रुजावा अशा अनेक उद्देशातून जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.अशा या विज्ञान प्रदर्शनातूनच विद्यार्थ्यांना भावी काळात वैज्ञानिक,शास्त्रज्ञ बनण्याची दिशा मिळते.भारताला विज्ञानाच्या क्षेत्रात एकमेव नोबेल पुरस्कार डॉ.सी.व्ही.रामन यांना मिळाला.भावी काळात नोबेल प्राईज मिळतील,या दर्जाचे नवनवीन संशोधन विद्यार्थ्यांनी केले पाहिजे आणि आपल्या देशाचे,राष्ट्राचे नाव जागतिक पातळीवर केले पाहिजे,अशी अपेक्षा यावेळी बोलताना त्यांनी व्यक्त केली.
         प्रास्ताविक प्रा.श्वेता मदने यांनी केले तर आभार स्वरूप गावकरे यांनी मानले.सूत्रसंचालन मंजुषा नाईकवाडी यांनी केले.प्रमुख पाहण्याचा परिचय आकाश सावंत यांनी करून दिला.यावेळी वेदांत सारडा,अंजली दहिरे,स्वराली, अथर्व भंडारे या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.या विज्ञान प्रदर्शनामध्ये 16 शाळा व महाविद्यालयांनी सहभाग नोंदवून 68 सायंटिफिक मॉडेल्स सादर केले होते.यामध्ये पदवी व पदव्युत्तर स्तरावर दयानंद विज्ञान महाविद्यालयातील विराज भीमपुरे व पेटकर शिवानी यांनी प्रथम,यश माने यांनी द्वितीय तर पुरणमल लाहोटी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज येथील ओमप्रकाश वाघ यांनी तृतीय क्रमांक मिळविला.6 वी ते 12 वी स्तरातून राजानारायण लाहोटी इंग्लिश स्कुल येथील बांगड रिशित,भुतडा स्वरित,सोमाणी राघवयांनी प्रथम,गोल्ड ख्रिस्ट हाय शाळेतील वेदांत सारडा आणि संत तुकाराम नॅशनल मॉडेल स्कुल येथील भंडारे अथर्व,गुटे कन्हय्या,कारतीकाय कटुरे यांनी संयुक्तरित्या दुसरा क्रमांक मिळवला तर शारदा इंटरनॅशनल स्कुल येथील वाघोलीकर दिगंबर, माने तुषार,हलकुंडे ईश्वर यांनी तृतीय क्रमांक मिळवला.या विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमुख मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम व प्रमाणपत्र देण्यात आली.याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख,प्राध्यापक,शिक्षकेत्तर कर्मचारी आणि लातूर जिल्ह्यातील विविध शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक,पालक बहुसंख्येने उपस्थित होते.
दयानंद विज्ञान महाविद्यालयात आयोजित  जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे शानदार उद्घाटन
 
राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विविध वैज्ञानिक कार्यक्रम
 
 लातूर : लातूर येथील दयानंद विज्ञान महाविद्यालयातील विज्ञान मंडळाद्वारा दि.28 फेब्रुवारी 2022 रोजी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त एक दिवसीय जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे लक्ष्मीरमणजी लाहोटी यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रंसगी त्यांनी भारतरत्न डॉ.सी.व्ही.रमण यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.त्यांच्यासमवेत  प्रमुख पाहुणे म्हणून दयानंद संस्थेचे सचिव रमेशजी बियाणी, दयानंद शिक्षण संस्थेचे संचालक अशिषजी बाजपेयी व श्री.अभय शाहा,प्राचार्य डॉ.जयप्रकाश दरगड,उपप्राचार्य डॉ.सिद्धेश्वर बेल्लाळे,दयानंद कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शिवाजी गायकवाड,कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.दिलीप जगताप,पर्यवेक्षक डॉ.मिलिंद माने,कार्यालयीन अधीक्षक राजेश सेलूकर,विज्ञान मंडळाच्या प्रभारी प्रा.श्वेता लोखंडे,प्रा.श्वेता मदने,दयानंद विज्ञान मंडळाचा अध्यक्ष स्वरूप गावकरे व उपाध्यक्ष ऋषिकेश चांडक व इतर पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
     या विज्ञान प्रदर्शनामध्ये लातूर जिल्ह्यातील एकूण १६ शाळा व महाविद्यालयांनी सहभाग नोंदवला.त्यामध्ये दयानंद ज्युनिअर कॉलेज,श्री केशवराज माध्यमिक विद्यालय,श्री. गोदावरीदेवी लाहोटी कन्या विद्यालय,शारदा इंटरनॅशनल स्कूल,गोल्ड क्रेस्ट हाई,संत तुकाराम नॅशनल मॉडेल स्कूल, ज्ञानप्रकाश बालविकास केंद्र, राजा नारायनलाल लाहोटी इंग्लिश स्कूल,महात्मा बसवेश्वर कॉलेज,डॉ.इक्बाल उर्दू गर्ल्स स्कूल,शिवाजी विद्यालय,श्री. मारवाडी राजस्थान विद्यालय, श्री.बंकटलाल लाहोटी इंग्लिश स्कूल,पुरणमल लाहोटी गवर्नमेंट पॉलिटेक्निक,दयानंद सायन्स कॉलेज आदि शाळा व महाविद्यालयाचा समावेश होता.या विविध शाळा व महाविद्यालयांनी
एकूण ६८ सायंटिफिक माॅडल्स सादर केले.त्यात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र,सुक्ष्मजीवशास्त्र, बायलाॅजी,जनरल सायन्स इत्यादि क्षेत्रांतील सायंटिफिक माॅडल्स समाविष्ट होते. प्रमुख पाहुण्यांनी सहभागी विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले.याप्रसंगी
दयानंद विज्ञान कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षक, प्राध्यापक,शिक्षकेत्तर कर्मचारी आणि लातूर जिल्ह्यातील विविध शाळा व महाविद्यालयातील सहभागी विद्यार्थी,शिक्षक,पालक बहुसंख्येने उपस्थित होते.
पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत दयानंद विज्ञान महाविद्यालयातील रासेयो स्वंयसेवकांचा उस्फूर्तपणे सहभाग 
 
लातूर : लातूर शहर महानगरपालिका यांच्या अंतर्गत दि.27 फेब्रुवारी 2022 रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात आली.या मोहिमेत 0 ते 5 वर्षे वयोगटातील सर्व बालकांचे पल्स पोलिओ लसीकरण करण्यात आले.या लसीकरण मोहिमेत दयानंद विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वंयसेवकानी उस्फूर्तपणे सहभाग नोंदवत 5 वर्षाच्या आतील एकही बालक लसीकरणापासून वंचित राहणार नाही यासाठी परिश्रमपूर्वक काम केले.यामध्ये केशवराज विद्यालय येथील बुथवर कपिल शिंदे,शंकर गुट्टे,दत्ता गिरी,संकेत भदाडे,श्रीकांत फासे,ऋषिकेश कांबळे,सुजित पाटील,ज्ञानेश्वर येरनुळे तर ज्ञानप्रकाश बालविकास विद्यालय येथील बुथवर वैष्णवी स्वामी,मयुरी बिराजदार,निकिता सुडे,ऋतुजा सूर्यवंशी,अंकिता वाघमारे, आकांक्षा भोसले,वैष्णवी शिरूरे आणि वाले इंग्लिश स्कुल येथील बुथवर आदिती शिंदे, राधिका झिरमिरे,वैष्णवी बोपलकर,आरती मोटेगावकर, स्वेता भेटे,नेहा कोरे,नेहा कबटे तसेच प्राथमिक विद्यामंदिर वैभव नगर येथील बुथवर अभिषेक मंदाडे,मंजुषा नाईकवाडी,प्रकाश निलंगे,मोहन शिंदे,आर्यन सांगवे, श्रुती पवार,मनियार मुबशीय इस्माईल या रासेयो स्वयंसेवक विद्यार्थ्यांचा समावेश होता.या स्वंयसेवकानी बुथच्या परिसरात घरोघरी जाऊन लाभार्थ्यांना माहिती देऊन लसीकरणासाठी प्रवृत्त केले.या वेगवेगळ्या बुथवर शेगसारे एस.टी.,राहुल रणुदासे, सुकन्या राठोड,प्रल्हाद साळुंके, प्रियंका बनसोडे,संगीता खरपडे,पोलेकर आर.एस., कल्याण गुळबिले,अश्विनी कांबळे,सुभद्रा आदमाने,माळी, निशा कांबळे,सुकेश गायकवाड असे अनेक वेगवेगळे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
       सदरील पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेतील सहभागाबाबत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयप्रकाश दरगड,उपप्राचार्य डॉ.एस.एस.बेल्लाळे,रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ.श्रेयस माहुरकर व प्रा.राहुल जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.
 
 
 
लातूर : दयानंद विज्ञान मंडळा अंतर्गत दयानंद विज्ञान महाविद्यालयात २८ फेब्रुवारी २०२२ रोजी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त एक दिवसीय जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.लातूर जिल्ह्यातील विविध शाळांचा यामध्ये सहभाग असणार आहे.आजच्या वैज्ञानिक युगात बालपणापासूनच विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानासंबंधित रुची निर्माण व्हावी या अनुषंगाने ह्या प्रदर्शनाचे आयोजन दयानंद विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जे.एस.दरगड,उपप्राचार्य डॉ.एस.एस.बेल्लाळे,विज्ञान मंडळाची प्रभारी प्रा‌.श्वेता लोखंडे,सहप्रभारी प्रा.श्वेता मदने,दयानंद विज्ञान मंडळाचे सर्व पदाधिकारी ह्यांनी विविध “इनोव्हेटिव्ह सायंटीफिक मॉडेल ” ह्या विषयाला अनुसरून ह्या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे.तरी लातूर शहरातील विविध शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ह्या विज्ञान प्रदर्शनाचा लाभ आणि आस्वाद घ्यावा असे आवाहन वरील सर्वांनी केले आहे.
लातूर : येथील दयानंद विज्ञान महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र व जैवतंञज्ञान विभाग आणि मायक्रोबायॉलॉजी सोसायटी ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने सर सर्गेई विनोग्राडस्की या शास्त्रज्ञाच्या स्मृतीदिनानिमित्त ‘ जीवनचक्र आणि सेंद्रिय पदार्थाचे विघटन ‘ या विषयावरील एक दिवसीय वेबिनार संपन्न झाले.याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष दयानंद विज्ञान महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.एस.एस.बेल्लाळे,प्रमुख पाहुणे सूक्षमजीवशास्त्र विभाग, योगेश्वरी महाविद्यालय, अंबाजोगाई येथील डॉ.अनिल नरसिंगे,कार्यशाळा समन्वयक व सूक्ष्मजीवशास्त्र विभाग प्रमुख डॉ.राहुल मोरे व डॉ.सुवर्णा चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
     याप्रसंगी प्रमुख पाहुणे डॉ.अनिल नरसिंगे यांनी ‘ सर सर्गेई विनोग्राडस्की’ या शास्त्रज्ञाच्या स्मृतीदिनानिमित्त ‘ जीवनचक्र आणि सेंद्रिय पदार्थांचे विघटन ‘ या विषयावर खोलवर विस्तृत माहिती दिली.तसेच आपल्या परीसरातील जैविक टाकाऊ घटकापासून जैविक खत कशाप्रकारे बनवू शकतो व त्यामुळे निसर्गाचा होणारा ऱ्हास टाळू शकतो या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. 
     दयानंद विज्ञान महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.एस.एस.बेल्लाळे यांनी आधुनिक युगातील सूक्ष्मजीवशास्त्रामध्ये तंत्रज्ञानाची जोड असणे कशा प्रकारे गरजेचे आहे,ते आपल्या मनोगतातून स्पष्ट केले.समारोप करताना डॉ.राहुल मोरे यांनी सूक्ष्मजीवशास्त्राचा विस्तार,विविधता आणि निसर्ग व पर्यावरणासाठी त्याचे महत्त्व विशद केले.
      कार्यशाळेचे प्रास्ताविक डॉ.महेश कराळे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ.राहुल मोरे यांनी केले.सूत्रसंचालन डॉ.सुवर्णा चौधरी यांनी केले.प्रमुख पाहुण्याचा परिचय प्रा.पुजा सोनसाळे यांनी केले.ऑनलाईन वेबिनारची तांत्रिक बाजू  संगणकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. रोहिणी शिंदे यांनी सांभाळली.सदरील वेबिनारसाठी प्राचार्य डॉ.जयप्रकाश दरगड यांचे मार्गदर्शन लाभले.याप्रसंगी प्रा.शैलजा धुतेकर,प्रा.शितल पाटील, डॉ.कोमल गोमारे,प्रा.अवंती बिडकर आदि प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थांनी उस्फूर्तपणे सक्रिय सहभाग नोंदविला.
लातूर : येथील दयानंद विज्ञान महाविद्यालयात दि.19 फेब्रुवारी 2022 रोजी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.दिलीप जगताप यांनी जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले आणि शिवजयंतीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छाही दिल्या.
      याप्रसंगी पर्यवेक्षक डॉ.मिलिंद माने,कार्यालयीन अधीक्षक राजेश सेलूकर,डॉ.युवराज सारणीकर,राजू पांचाळ,लखन सावंत,पोपट वाजपेयी,संजय नावंदर,सचिन सूर्यवंशी,नितीन नडगिरे यांच्यासह आदि प्राध्यापक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
लातूर : येथील दयानंद विज्ञान महाविद्यालय आणि इन्स्टिट्युशन इनोवेशन काऊन्सिल (आय.आय.सी) यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय हर्बल एक्सट्रॅक्शन युनिट,निओलिवा लाईफ सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड,नांदेड येथे विद्यार्थ्यांनी भेट दिली.या भेटी दरम्यान हर्बल एक्स्ट्रॅक्शन युनिट अंतर्गत विविध औषधीय वनस्पतीमधून औषधी संयुगाचे विलगीकरण करून त्यांचा विविध आजारांवरही उपचार करण्यासाठी वापर केला जातो.या प्रकियेचे प्रात्यक्षिक मार्गदर्शन डॉ.अमोल शिरफुले (सीइओ आणि मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ निओलिवा लाईफ सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड,नांदेड) यांनी विद्यार्थ्यांना करून दिले.या प्रात्यक्षिका दरम्यान विद्यार्थ्यांनी नावीन्यपूर्ण वैज्ञानिक संकल्पना अनुभवण्यास मिळाली.डॉ.अमोल शिरफुले त्यांच्या अथक प्रयत्नांनी आणि परिश्रमाने एक नवीन हर्बल एक्स्ट्रॅक्शन युनिट उदयास आणले असून त्याचा सामान्य जनजीवनाला उपयोग होत आहे.तसेच जैवतंत्रज्ञान विभागाचे महत्त्व खुप चांगल्या प्रकारे पटवून सांगितले.
           या भेटीदम्यान डॉ.अविनाश अमृतवाड यांच्या श्रीनिलाई आयुर्वेद हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर येथे भेट देण्यात आली.दरम्यान पंचकर्मा केंद्र तसेच पंचकर्मामधील विविध प्रक्रियाचे मार्गदर्शन करण्यात आले.डॉ.अविनाश अमृतवाड यांच्या नाममात्र सेवाशुल्क साकारलेला अभिनव उपक्रम समजून घेण्यात आला.तसेच,श्री गोवर्धन गो सेवा येथे विद्यार्थ्यांनी भेट दिली.गोरक्षण ही काळाची गरज आहे.या प्रकल्पातून समाजाला नवा संदेश,दिशा देण्यात येत आहे.गोसेवा प्रकल्पात हजारो गायींना निवारा,पाणी,दवाखाना अशा सोयीसुविधा पुरवण्याचा प्रयत्न असतो.दयानंद विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी प्रोत्साहित होऊन निधी जमा करून दिला.या युनिटच्या सभोवताली डॉ.शिरफुले यांनी देवकापूस,पळस,बेल,चेरी,फण, मोसंबी,चिकू,आवळा इत्यादी वनस्पतीची लागवड करून संगोपन करत असतात.या वनस्पतीच्या औषधीय गुणधर्म सांगून सखोल मार्गदर्शन केले.या भेटीदम्यान मुख्य अतिथी संस्थापक तथा उद्योजक यांनीही प्रमुख उपस्थिती दर्शवून विद्यार्थ्याना उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.
         सदरील विविध औद्योगिक ठिकाणांना प्राचार्य डॉ.जयप्रकाश दरगड व उपप्राचार्य डॉ.सिद्धेश्वर बेल्लाळे यांच्या मार्गदर्शनातून भेटी देण्यात आल्या.या भेटीसाठी पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थी,जैतंत्रज्ञान विभागाचे समन्वयक डॉ.कोमल गोमारे,प्रा.श्वेता मदने,डॉ.पूजा नागिमे,श्री.मदने,श्री.ए.एम.मदने यांची उपस्थिती होती.
लातूर : येथील दयानंद विज्ञान महाविद्यालयास महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने करिअर कट्टा या उपक्रमाअंतर्गत राज्यस्तरीय उत्कृष्ट  महाविद्यालयाचा उत्तेजनार्थ पुरस्कार नुकताच मिळालेला आहे,तर डॉ.कोमल गोमारे यांना उत्कृष्ट जिल्हा समन्वयक हा पुरस्कार मिळालेला आहे.त्याबद्दल महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.सिद्धेश्वर बेल्लाळे व नॅक समन्वयक डॉ.रवींद्र सोळुंके यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
         याशिवाय मायक्रोबायोलॉजिस्ट सोसायटी ऑफ इंडिया यांच्यातर्फे सायंटिफिक कॅलेंडर मेकिंग स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती.या स्पर्धेत दयानंद विज्ञान महाविद्यालयाने राष्ट्रीय पातळीवर तृतीय क्रमांक मिळविला.या सायंटिफिक कॅलेंडरच्या डिझायनर प्रा.श्वेता मदने,डॉ.कोमल गोमारे व त्यांच्या टीममधील अलिशा शेख,प्रमोद कदम,स्वरूप गावकरे,स्नेहल पाटील,मयुरी जाधव या सर्वांचा प्राचार्य डॉ.जयप्रकाश दरगड व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.याचबरोबर आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज,लांजा,रत्नागिरी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या व्हिडिओ मेकिंग स्पर्धेत एम.एस्सी.द्वितीय वर्षातील श्रीनिवास कुलकर्णी या विद्यार्थ्यांनी ‘ कॅन्सर अवेरनेस प्रोग्राम 2022’ या विषयावर व्हिडिओ बनवून या स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळविला,त्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला.याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख,प्राध्यापक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
लातूर : येथील दयानंद विज्ञान महाविद्यालयात दि.15 फेब्रुवारी 2022 रोजी संत सेवालाल महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयप्रकाश दरगड यांनी क्रांतिकारी सद्गुरू सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
        याप्रसंगी उपप्राचार्य डॉ.दिलीप जगताप,डॉ.युवराज सारणीकर,कार्यालयीन अधीक्षक राजेश सेलूकर,पर्यवेक्षक डॉ.मिलिंद माने,प्रा.व्यंकट केलै, बन्सी कांबळे,सुनील खडबडे, दिलीप राठोड,प्रदीप जावळे, विनोद घार,गीता चौधरी,धीरज पारीख,बाबू शेख,सुजित अपसिंगेकर,रामचंद्र सलगर,सुदाम सातपुते यांच्यासह प्राध्यापक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
 *डॉ.कोमल गोमारे यांना उत्कृष्ट जिल्हा समन्वयक म्हणून पुरस्कार* 
 
लातूर : येथील दयानंद विज्ञान महाविद्यालयास महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने “करिअर कट्टा” या उपक्रमांतर्गत राज्यस्तरीय *उत्कृष्ट उत्तेजनार्थ महाविद्यालयाचा पुरस्कार* जाहीर झाला आहे.
       महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे राज्य अध्यक्ष यशवंत शितोळे यांनी गुरुवार (दि.०९) रोजी एका परिपत्रकाच्या माध्यमातून विविध क्षेत्रासाठीचे पुरस्कार जाहीर केले.त्यात दयानंद विज्ञान महाविद्यालयाचा उत्कृष्ट महाविद्यालय हा उत्तेजनार्थ पुरस्कार देण्यात येत असल्याचे जाहीर केले.या उपक्रमांतर्गत विविध स्पर्धा आणि विशेष प्राविण्य अशा प्रकारच्या सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल हा पुरस्कार दिला जातो.विभागानुसार प्रत्येक विभागास एक असे पुरस्कार घोषित केले आहेत.
        तसेच दयानंद विज्ञान महाविद्यालयाच्या *प्रा. डॉ. कोमल गोमारे* ह्या महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने “करिअर कट्टा” या उपक्रमांतर्गत लातूर जिल्हा समन्वयक म्हणून कार्यरत आहेत.गेल्या वर्ष भरामध्ये डॉ.गोमारे यांनी “करिअर कट्टा” अंतर्गत नावीन्यपूर्ण विविध जिल्हास्तरीय उपक्रम आयोजित केले व राज्यस्तरीय लातूर जिल्ह्याची आगळी – वेगळी ओळख दाखविली.त्यांच्या कार्याची दखल घेवून महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने “करिअर कट्टा” या उपक्रमांतर्गत *उत्कृष्ट जिल्हा समन्वयक* नांदेड विभाग पुरस्कारही घोषित करण्यात आले आहे.असा दुहेरी पुरस्कार महाविद्यालयास प्राप्त झाल्यामुळे महाविद्यालयाच्या गुणवत्तेत आणखी भर पडलेली आहे.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयप्रकाश दरगड,डॉ.कोमल गोमारे व प्राध्यापकांच्या महत्त्वपूर्ण योगदानामुळे हे दोन्ही राज्यशासनाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
    महाराष्ट्र शासनाचे हे दुहेरी पुरस्कार महाविद्यालयास  मिळाल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयप्रकाश दरगड व डॉ.कोमल गोमारे यांचे अभिनंदन व कौतुक दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमणजी लाहोटी, उपाध्यक्ष अरविंदरावजी सोनवणे, सचिव रमेशजी बियाणी,संयुक्त सचिव सुरेशजी जैन,उपप्राचार्य डॉ.सिद्धेश्वर बेल्लाळे,कार्यालयीन अधीक्षक राजेश सेलूकर,सर्व विभाग प्रमुख,प्राध्यापक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी केले आहे.
लातूर : येथील दयानंद विज्ञान महाविद्यालयातील संगणकशास्त्र विभाग व हायटेक स्किल्स व्हेंचर्स,पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने संगणकशास्त्र विद्यार्थ्यांसाठी ‘ डेटा सायन्स आणि आयटी क्षेत्रातील नोकरीच्या संधी ‘ या विषयावर करिअर मार्गदर्शन सेमिनार आणि प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली.याप्रसंगी प्रमुख पाहुणे मार्स्क जीएससी येथील वरिष्ठ प्रक्रिया विश्लेषण संजय करमपुरी,हायटेक स्किल व्हेंचर्स ,पुणे येथील संचालक डॉ.धनंजय देशपांडे व विजय रासोते,संगणकशास्त्र विभाग प्रमुख डॉ.रोहिणी शिंदे,प्रा.संगीता जाजू यांची प्रमुख उपस्थिती होती.
     याप्रसंगी साधन व्यक्ती संजय करमपुरी यांनी संगणकशास्त्र हा विषय विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीने किती महत्त्वाचा आहे,हे सांगत असताना सद्यःस्थितीत डेटा सायन्स आणि आयटी क्षेत्रात नोकरीच्या अनेक संधी आहेत,त्या संधीचे सोने करीत आपले भविष्य उज्ज्वल करावे, असे त्यांनी सांगितले.
       प्रास्ताविक डॉ.धनंजय देशपांडे यांनी केले तर आभार विजय रासोते यांनी मानले.सूत्रसंचालन आदिती शिंदे यांनी केले.याशिवाय संगणकशास्त्र विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या प्रश्नमंजुषा स्पर्धेत प्रशांत हांडे यांनी प्रथम, हरिष कुलकर्णी यांनी द्वितीय आणि शितल कांबळे व शेख आरिफ जावेद यांनी संयुक्तरित्या तृतीय क्रमांक मिळविला.सदरील सेमिनार व प्रश्नमंजुषा स्पर्धा प्राचार्य डॉ.जयप्रकाश दरगड व उपप्राचार्य डॉ.सिद्धेश्वर बेल्लाळे यांच्या मार्गदर्शनातून संपन्न झाली.याप्रसंगी प्रा.सुजाता काळे, प्रा.एम.बी.सुगरे,प्रा.व्ही.जी.
कुलकर्णी,प्रा.निकिता शिंदे,प्रा.कांचन कदम,प्रा. शुभांगी चिक्राळे,प्रा.के.एस.सारडा,प्रियंका हिप्परकर यांच्यासह प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी असे एकूण 76 जण उपस्थित होते.
लातूर : येथील दयानंद विज्ञान महाविद्यालयातील युवती कल्याण मंडळाच्या माध्यमातून दि.07 फेब्रुवारी 2022 रोजी विद्यार्थ्यांनी पथनाट्याच्या माध्यमातून कोरोना प्रतिबंधात्मक उपाय व लसीकरण या संदर्भात जनजागृतीचा संदेश दिला.याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.सिद्धेश्वर बेल्लाळे, युवती कल्याण मंडळ प्रभारी प्रा.शितल पाटील,सहसमन्वयक डॉ.मनीषा गुरमे,नॅक समन्वयक डॉ.रवींद्र सोळुंके,डॉ.चंद्रशेखर स्वामी यांची प्रमुख उपस्थिती होती.
       संपूर्ण जग हे कोविड-19 परिणामामुळे त्रस्त झाले आहे.या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासकीय स्तरावर अनेक उपाययोजना राबविण्यात आल्या.त्यात कोरोना जनजागृती,मास्कचा वापर,सोशल डिस्टंट, लसीकरण आणि लाॅकडाऊन आदींचा समावेश आहे.याचाच भाग म्हणून केंद्र व राज्य शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत दयानंद विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी कोरोना प्रतिबंधात्मक व लसीकरणाविषयी पथनाट्याच्या माध्यमातून लातूर शहरातील शिवाजी चौक,गांधी चौक,बस स्टॅन्ड,पटेल चौक,शाहू चौक, दयानंद विज्ञान महाविद्यालय व महात्मा बसवेश्वर कॉलेज समोर जनजागृती केली.सर्वांनी लसीकरण करून घ्या आणि कोरोनाला हरवा असा संदेशही दिला.या पथनाट्यमध्ये वैष्णवी दिवेगावकर,मंजुषा नाईकवाडी, विदुला राजमाने,साक्षी मदने,श्रुती पवार यांनी सहभाग नोंदविला.याप्रसंगी गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली.सदरील पथनाट्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयप्रकाश दरगड यांचे मार्गदर्शन लाभले.या पथनाट्याच्या यशस्वीतेसाठी चेतन पाटील,योगेश तडुळे, निलेश डांगे, रामराजे काळे, अभिषेक मंदाडे, अक्षय कुलकर्णी,माधव सूर्यवंशी, मदने यांचेही सहकार्य लाभले.
लातूर :भारतीय विद्यार्थी राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रत्येक  क्षेत्रात आपली छाप पाडत आहेत.ते कुठेही कमी पडत नाहीत.त्याला वैज्ञानिक क्षेत्रही अपवाद नाही.माहिती तंत्रज्ञान, विज्ञानक्षेत्रात विद्यार्थ्यांना भविष्यात अनेक संधी आहेत.विज्ञानाची गरज व महत्त्व अनन्यसाधारण असे आहे,म्हणून विज्ञानातील संधीचे सोने करीत जागतिक पातळीवर आपले स्थान निश्चित केले पाहिजे,असे प्रतिपादन वाशिंग्टन डी. सी.युनायटेड स्टेटस ऑफ अमेरिका येथील सॉफ्टवेअर इंटिग्रेशन इंजिनिअर गणेश बुलबुले यांनी केले.
       दयानंद विज्ञान महाविद्यालयातील विज्ञान मंडळाचे उद्घाटन 3 फेब्रुवारी 2022 रोजी आँनलाईन पद्धतीने झाले.यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयप्रकाश दरगड होते.याप्रसंगी उपप्राचार्य डॉ.सिद्धेश्वर बेल्लाळे हे उपाध्यक्षपदी होते,प्रमुख अतिथी आझाद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ई.यू.मासुमदार,प्रभारी प्रा.श्वेता लोखंडे व प्रा.श्वेता मदने यांची प्रमुख उपस्थिती होती.
    प्राचार्य डॉ.जयप्रकाश दरगड अध्यक्षीय संबोधन करताना असे म्हणाले की,विज्ञान मंडळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास आणि विज्ञानासंबंधी अभिरुची निर्माण करणे व वैज्ञानिक युगात विद्यार्थ्यानी स्वतःचा ठसा उमटवणे या उद्देशातून या  मंडळाला सातत्याने प्रोत्साहन दिले जाते.
       प्रास्ताविक प्रा.श्वेता लोखंडे यांनी केले तर आभार ऋषिकेश चांडक यांनी मानले.विज्ञान मंडळ अध्यक्ष स्वरूप गावकरे यांनी  विज्ञान मंडळाची भूमिका सांगितली.सूत्रसंचालन इन्सिया पटेल यांनी केले.विद्यार्थी व गणेश बुलबूले यांच्यामध्ये संवाद झाला. बाहेरच्या देशात संधी तसेच त्यामध्ये यश प्राप्त करायचं असेल तर काय गोष्टी गरजेच्या आहेत ते सुद्धा त्यांनी सांगितले.याप्रसंगी विज्ञान मंडळातील नम्रता घोडके,प्रताप आल्ते,प्रसाद सलगर,भक्ती पोतदार,विकास,निसार शेख,दिया नाईकवाडे,स्वेता,ओंकार सुरवसे, कीरण होडाडे,मंजुषा नाईकवाडी, आकाश सावंत यांच्यासह माजी विद्यार्थी,वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी असे एकूण 500 पेक्षा जास्त जण उपस्थित होते.
लातूर : येथील दयानंद विज्ञान महाविद्यालयाच्या वैज्ञानिक दिनदर्शिका -2022 चे प्रकाशन दि.01फेब्रुवारी 2022 रोजी दयानंद शिक्षण संस्था ऑफिस येथे दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमणजी लाहोटी व सचिव रमेशजी बियाणी यांच्या हस्ते झाले.याप्रसंगी श्री.सागर मंत्री,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयप्रकाश दरगड,उपप्राचार्य डॉ.सिद्धेश्वर बेल्लाळे,दयानंद विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पुनम नाथानी,दयानंद फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.क्रांती सातपुते,नॅक समन्वयक डॉ.रवींद्र सोळुंके,कॅलेंडर डिझायनर प्रा.श्वेता मदने,डॉ.कोमल गोमारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
         याप्रसंगी दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमणजी लाहोटी असे म्हणाले की, दयानंद विज्ञान महाविद्यालयातील प्राध्यापकांनी,प्रा.श्वेता मदने यांनी अथक अशा परिश्रमातून जी वैज्ञानिक दिनदर्शिका प्रकाशित केलेली आहे आणि योग्य पद्धतीने डिझायन केलेली आहे,तो एक चांगला उपक्रम आहे.या वैज्ञानिक दिनदर्शिकेचा सर्व प्राध्यापक,विद्यार्थ्यांना निश्चितच फायदा होईल.
       दयानंद शिक्षण संस्थेचे सचिव रमेशजी बियाणी असे म्हणाले की, प्राध्यापकांनी केवळ वर्गात अध्यापन करणे,शिकविणे हाच हेतू डोळ्यासमोर न ठेवता अध्यापनाबरोबर नवनवीन संकल्पना राबवल्या पाहिजेत.ज्या पद्धतीने वैज्ञानिक दिनदर्शिका काढून एक नवीन संकल्पना, उपक्रम महाविद्यालयातील प्राध्यापकांनी राबविला, यातूनच  वर्क कल्चर व स्मार्ट कल्चरकडे निश्चितपणाने वाटचाल सुरू आहे, ही कौतुकास्पद बाब आहे.याचबरोबर दयानंद शिक्षण संस्थेत सबंध महाराष्ट्रातून व इतर राज्यांतूनही विद्यार्थी शिक्षण घेत आहेत,त्या सर्वांना या वैज्ञानिक दिनदर्शिकेचा निश्चितच उपयोग होईल.
     महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयप्रकाश दरगड यांनी महाविद्यालय हे वैज्ञानिक दिनदर्शिका, उन्मेष वार्षिकांक, संशोधन क्षेत्रातील प्राध्यापक, विद्यार्थी यांचे योगदान आणि नवनवीन उपक्रम,कार्यशाळा राबविण्यात अग्रेसर असते,असे ते म्हणाले.
    प्रास्ताविकातून डॉ.कोमल गोमारे यांनी कॅलेंडर तयार करण्यामागची भूमिका सांगितली. सूत्रसंचालन व आभार प्रा.श्वेता मदने यांनी मानले.राज्यस्तरीय ऊर्जा संवर्धन प्रथम पुरस्कार मिळाल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयप्रकाश दरगड यांचा,उन्मेष वार्षिकांकास स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा उत्तेजनार्थ पुरस्कार मिळाल्याबद्दल मुख्य संपादक प्रा.मेघा पंडित,डॉ.चंद्रशेखर स्वामी,डॉ.गजानन बने,डॉ.विजेंद्र चौधरी,डॉ.रामशेट्टी शेटकार यांचा याशिवाय शिवछत्रपती कॉलेज औरंगाबादद्वारा आयोजित राज्यस्तरीय संशोधन सादरणीकरण स्पर्धेत उत्तेजनार्थ बक्षीस मिळाल्याबद्दल स्वरूप गावकरे व प्रतिक्षा कुलकर्णी या सर्वांचा प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.याप्रसंगी डॉ.युवराज सारणीकर, डॉ.नंदिनी कोरडे,डॉ.रत्ना कीर्तने, डॉ.मनीषा गुरमे, डॉ.राहुल मोरे, डॉ.आण्णाराव चौगुले,डॉ.जमन अनगुलवार,प्रा.शिवाजी आळणे, डॉ.श्रेयस माहुरकर,प्रा.राहुल जाधव, प्रा.शैलजा धुतेकर, प्रा.विद्या गिराम,प्रा.चांडक आदी प्राध्यापक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
लातूर : येथील दयानंद विज्ञान महाविद्यालयात भाषा विभाग व कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने दि.30 जाने.2022 हा दिवस राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून ‘ हुतात्मा दिन ‘ म्हणून साजरा करण्यात आला.सदरील दिनाच्या निमित्ताने हुतात्म्याचे स्मरण करीत भारतीय स्वातंत्र्याचे शिल्पकार म.गांधीजी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.सिद्धेश्वर बेल्लाळे व कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.दिलीप जगताप यांनी विनम्र अभिवादन केले आणि म.गांधीजींचे सत्य,अहिंसा आणि करुणा अशा जगाला शांतीचा संदेश देणार्‍या विचारांचा सर्वांनी अंगीकार करावा,यासाठी आवाहन केले.
        याप्रसंगी डॉ.नंदिनी कोरडे, भाषा विभागातील डॉ.शेटकार रामशेट्टी,प्रा.आय.जे.शेख,संजय कांबळे,बालाजी पिटले,खंडेराव सरतापे,अजय ओव्हाळ यांच्यासह प्राध्यापक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.त्यांनीही विनम्र अभिवादन केले.
लातूर : येथील दयानंद विज्ञान महाविद्यालय व गांधी रिसर्च फाऊंडेशन,जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दि.30 जानेवारी 2022 रोजी ‘गांधी विचार संस्कार परीक्षा ‘ संपन्न झाली.महात्मा गांधीजी यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून त्यांचे सत्य,अहिंसा,करुणा आदि विचार विद्यार्थ्यांमध्ये रुजावे आणि त्यांच्या विचारांची मूल्ये समाजजीवनात रूजावित अशा सर्वव्यापक उद्देशातून या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.कोरोनासारख्या आव्हानांना यशस्वीपणे सामोरे जाण्याची क्षमता महात्मा गांधीजींच्या विचारधारेमध्ये आहे,याची प्रचिती आपणाला आलीच आहे.अशा या मानवी मूल्यांचा संदेश देत कोविड-19 नियमाचे पालन करीत ही परीक्षा यशस्वीपणे पार पडली.
    सदरील परीक्षेस बी.एस्सी.,एम.एस्सीचे विद्यार्थी व महाविद्यालयातील प्राध्यापक अशा एकूण 91 परीक्षार्थीनी नाव नोंदणी केलेली होती.त्यापैकी एकूण 58 परीक्षार्थींनी परीक्षा दिली.या परीक्षेच्या यशस्वीतेसाठी परीक्षा समन्वयक डॉ.नंदिनी कोरडे व प्रा.राहुल जाधव यांनी परिश्रम घेतले.या परीक्षेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयप्रकाश दरगड व उपप्राचार्य डॉ.सिद्धेश्वर बेल्लाळे यांचे मार्गदर्शन लाभले.
लातूर : येथील दयानंद विज्ञान महाविद्यालयातील भाषा विभागाच्या वतीने दि.24 जाने.2022 रोजी मराठी भाषा संवर्धन पंधरवडानिमित्त विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या भित्तिपत्रकाचे विमोचन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयप्रकाश दरगड व दयानंद कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.पी.गायकवाड यांच्या हस्ते झाले.याप्रसंगी इंग्रजी विभाग प्रमुख प्रा.मेघा पंडित,हिंदी विभाग प्रमुख डॉ.गजानन बने,मराठी विभाग प्रमुख डॉ.रामशेट्टी शेटकार,डॉ.श्याम इबाते,डॉ.कोमल गोमारे, प्रा.श्वेता मदने यांची प्रमुख उपस्थिती होती.
         शितल राठोड व अशोक गुटलकर यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस, वैष्णवी मुद्दे यांनी राष्ट्रीय मतदार दिन व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले,सुजित साळुंके यांनी हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे,कपिल शिंदे यांनी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा,अपूर्वा  सोनकांबळे यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि विशाल देशमुख यांनी थोर समाजसुधारक महात्मा फुले यांच्या जीवनकार्यावर प्रकाशझोत टाकणारे अप्रतिम असे भित्तिपत्रक तयार केले होते.त्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयप्रकाश दरगड व दयानंद कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.पी गायकवाड यांनी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा,नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांची जयंती व राष्ट्रीय मतदार दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देऊन या उपक्रमामध्ये सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले.भित्तिपञक तयार केलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.याप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक यांच्यासह सुनील राक्षे,शंकर भालके आदि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
लातूर : भारत हे जगातील सर्वात मोठे लोकशाहीप्रधान राष्ट्र असून लोकशाही सक्षमीकरणासाठी भारतातील प्रत्येक नागरिकांनी पुढे पाऊल टाकले पाहिजे.18 वर्ष पूर्ण झालेल्या युवकांनी,तरुणाईनी आपला मतदानाचा मूलभूत हक्क बजावला पाहिजे.निवडणूक प्रक्रियेत मतदारांनी निपक्ष:पातीपणे केलेले मतदान लोकशाहीला बळकटी देत असते.मतदान हे सर्वश्रेष्ठ दान असून एका मतामध्ये संपूर्ण सत्ता बदलण्याची ताकद असते.म्हणून मतदान नाही केले तर एका मताने काय होणार आहे ही संकुचित मानसिकता बदलली पाहिजे.गावपातळीपासून ते देशपातळीपर्यंतच्या सार्वत्रिक मतदान प्रक्रियेत प्रत्येक भारतीय नागरिकांनी मतदान केलेच पाहिजे, लोकशाही सक्षमीकरण आणि शंभर टक्के मतदानासाठी मतदार जनजागृतीची आवश्यकता आहे,असे प्रतिपादन सोलापूर येथील विभागीय शिक्षण सहसंचालक,उच्चशिक्षण विभाग डॉ.अशोक उबाळे यांनी केले.
          लातूर येथील दयानंद विज्ञान महाविद्यालय आणि सहसंचालक कार्यालय,नांदेड विभाग,नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने दि.25 जाने.2022 रोजी ‘ राष्ट्रीय मतदार दिना’ च्या निमित्ताने ‘ मतदार जनजागृती ‘ या विषयावर एक दिवसीय जिल्हास्तरीय मार्गदर्शन ऑनलाईन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.शिबिराच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयप्रकाश दरगड होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे दयानंद कला महाविद्यालयातील राज्यशास्ञ विभाग प्रमुख डॉ.संतोष पाटील,उपप्राचार्य डॉ.सिद्धेश्वर बेल्लाळे,नोडल कॉर्डिनेटर डॉ.श्याम इबाते,डॉ.गजानन बने,डॉ.श्रेयस माहुरकर,डॉ.कोमल गोमारे,डॉ.रामशेट्टी शेटकार,प्रा.श्वेता मदने,तांञिक समन्वयक डॉ.रोहिणी शिंदे व सचिन पंतगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
       याप्रसंगी डॉ.संतोष पाटील म्हणाले की, प्रत्येक भारतीय नागरिकांचे मत अमूल्य असून ते राष्ट्र व लोकशाहीनिर्मितीचा भक्कम असा पाया आहे.म्हणून प्रत्येक भारतीय नागरिकांनी जात,धर्म,वंश,वर्ण,भाषा,प्रांत असा कोणताही भेदभाव न करता आणि कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता मतदान केले पाहिजे.युवकांनी,विद्यार्थ्यांनी स्वतः मतदान करीत व इतरांनाही प्रोत्साहन देत मतदार जनजागृती केली पाहिजे.मतदार जनजागृती रॅली काढली पाहिजे.भारतीय संविधानाने मतदानाचा दिलेला हक्क बजावून देशाचा विकास व  प्रगतीत सक्रीय सहभाग नोंदवला पाहिजे,असे ते म्हणाले.
        अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ.जयप्रकाश दरगड असे म्हणाले की,मतदार जनजागृती करणे ही आधुनिक काळाची गरज आहे.कारण दिवसेंदिवस मतदानाविषयी वाढणारी उदासीनता व घसरणारी शेकडेवारी यामुळे निवडणुकीत भारतीय लोकांचा सक्रिय सहभाग वाढविण्याच्या दृष्टीने 2011 सालापासून भारत सरकारने भारत निवडणूक आयोगाचा स्थापना दिन 25 जाने.हा दिवस राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला जातो.शासनाचे परिपत्रक, भारतीय संविधानाने दिलेला मतदानाचा हक्क आणि देशाच्या लोकशाही सक्षमीकरणासाठी प्रत्येक भारतीय नागरिकांनी,विद्यार्थ्यांनी सार्वत्रिक मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदवून आपले कर्तव्य बजावले पाहिजे,यातूनच लोकशाही बळकट होते.म्हणूनच मतदार जनजागृतीची गरज आहे,असे ते म्हणाले.
        प्रास्ताविक डॉ.कोमल गोमारे यांनी केले तर आभार डॉ.गजानन बने यांनी मानले.सूत्रसंचालन प्रा.श्वेता मदने यांनी केले व प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ.रामशेट्टी शेटकार यांनी करून दिला.यावेळी विभागीय सहसंचालक उच्चशिक्षण विभाग डॉ.अशोक उबाळे यांच्यासमवेत राष्ट्रीय मतदार दिनाच्या निमित्ताने सर्वांनी शपथ घेतली.शहीद भगतसिंग महाविद्यालय,किल्लारी येथील वर्षा कुंभार,महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय,उदगीर येथील प्रथमेश देशपांडे आणि दयानंद विज्ञान महाविद्यालयातील रामराजे काळे या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.याप्रसंगी लातूर जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील प्राचार्य,प्राध्यापक,विद्यार्थी यांच्यासह राजमाने विदुला,पल्लवी कोकरे,चेतन घोडके आणि शिक्षकेत्तर कर्मचारी असे एकूण 519 जण उपस्थित होते.
लातूर : येथील दयानंद विज्ञान महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा (14 जाने. ते 28 जाने.2022) निमित्त दि.21 जाने.2022 रोजी ‘ मराठी वाचन कट्टा उपक्रमा ‘चे आयोजन करण्यात आले होते.या उपक्रमांमध्ये शितल अंकुश राठोड,अंजली अशोक शेंडगे,वैष्णवी ज्ञानोबा मद्दे,दर्शन भरत मिटकरी,सागर गोपाळ कोव्हाळे आदि विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.सदरील उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयप्रकाश दरगड व उपप्राचार्य डॉ.एस.एस.बेल्लाळे,याचबरोबर भाषा विभागातील प्रा.मेघा पंडित,डॉ.गजानन बने,प्रा.विद्या गिराम यांचीही प्रेरणा व प्रोत्साहन मिळाले.
        याप्रसंगी मराठी विभाग प्रमुख डॉ.रामशेट्टी शेटकार  विद्यार्थ्यांना उद्देशून असे म्हणाले की,जागतिकीकरण आणि सोशल मीडियाच्या या बदलत्या युगात विद्यार्थ्यांनी वाचन संस्कृतीची जपवणूक करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे.कारण मराठी साहित्यात ज्ञानाचे भांडार अवाढव्य असून विद्यार्थ्यांनी कथा,कविता,कादंबरी,नाटक,
चरित्र,आत्मचरित्र आदींचे वाचन केले पाहिजे.इंटरनेट,फेसबुक,
व्हाट्सअप,इंस्टाग्राम, मोबाईलच्या आभासी युगामध्ये जास्तीचा वेळ न घालवता आपली संस्कृती आणि आपली मातृभाषा मराठी भाषेचे संवर्धन केले पाहिजे.मराठी ही संस्कारशील भाषा आहे,ती ज्ञानभाषा आहे.तिला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे.अशा या मराठी भाषेच्या व इतर अधिकाधिक वाचनातून ज्ञान आणि बुद्धी परिपक्व होते,वैचारिक पातळीही वाढते.यातूनच आपल्या व्यक्तिमत्व आणि उज्ज्वल भावी आयुष्याची जडणघडण होते,असे ते म्हणाले.
    सदरील उपक्रम हा मायक्रोसॉफ्ट टिम्सच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला होता आणि या उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
लातूर : पुरुषप्रधान संस्कृतीच्या बंदिस्त चौकटीत स्त्रियांना प्राचीन,मध्ययुगीन आणि आधुनिक काळातही बहुतांशपणे दुय्यमच स्थान देण्यात आले आहे.परंपरेच्या जोखडातील तिच्यावरील अन्याय,अत्याचार, बलात्कार,अपहरण,हुंडाबळी यांचे प्रमाण अजूनही कमी झालेले नाही.अशा या परिस्थितीत महिला सक्षमीकरण करण्यासाठी संविधान,कायदा, न्यायालय,प्रसारमाध्यमे,पोलीस आदींची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.याशिवाय सर्वांगीण स्त्री शिक्षण हाच महिला सक्षमीकरणाचा खरा मार्ग आहे.जेव्हा मुली शिक्षण घेतात तेव्हा मानव अधिकारांचे जतन,सामाजिक समानता प्रस्थापित होते.त्या स्वावलंबी होऊन बालविवाह,बालमृत्यू, मातामृत्यू यांचा दर घटतो.राष्ट्र विकासालाही चालना मिळते.एवढेच नव्हे तर महिलांनी सावित्रीबाई फुले,राजमाता जिजाऊ,झाशीची राणी लक्ष्मीबाई अशा थोर स्त्री समाजसुधारकांचा आदर्श घेऊन जागतिक स्तरावर  प्रत्येक क्षेत्रात आणखीन पुढे पाऊल टाकले पाहिजे,असे प्रतिपादन उद्घाटनप्रसंगी बोलताना लातूर येथील राजर्षी शाहू महाविद्यालयातील डॉ.प्रीति पोहेकर यांनी केले.
          येथील दयानंद विज्ञान महाविद्यालयातील युवती कल्याण मंडळाच्या वतीने दि.13 जाने.2022 रोजी ‘महिला सक्षमीकरणाची सध्याची परिस्थिती ‘(महिला सक्षमीकरण : संकल्पना आणि वास्तव,शिक्षण आणि समाजापुढील आव्हाने)या विषयावर एकदिवसीय ऑनलाईन वेबिनारचे मायक्रोसाॅफ्ट टिम्सच्या माध्यमातून आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी त्या प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होत्या.अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.सिद्धेश्वर बेल्लाळे होते.याप्रसंगी युवती कल्याण मंडळ व वेबिनार समन्वयक  प्रा.शितल पाटील व डॉ.मनीषा गुरमे यांची प्रमुख उपस्थिती होती.
      अध्यक्षीय समारोप करताना उपप्राचार्य डॉ.सिद्धेश्वर बेल्लाळे  म्हणाले की,महिला सक्षमीकरण करणे ही आधुनिक काळाची गरज आहे.या सक्षमीकरणासाठी महिलांना,मुलींना दयानंद शिक्षण संस्था व महाविद्यालयाच्या माध्यमातून सतत प्रोत्साहन दिले जाते.म्हणूनच प्रत्येक कार्यक्रमात,उपक्रमात मुली चांगल्या पद्धतीने नेतृत्व करताना दिसतात.गुणवत्तेच्या बाबतीतही मुलीच अग्रेसर आहेत.त्यांनी प्रत्येक क्षेत्रात एक पाऊल पुढे टाकत आपली छाप पाडली पाहिजे,असे ते म्हणाले.
      प्रास्ताविक मंजुषा नाईकवाडी यांनी केले तर आभार मोनिका मुसळे यांनी मानले.सूत्रसंचालन गौरवी जाधव यांनी केले.प्रमुख पाहुण्याचा परिचय अंजली शेंडगे यांनी करून दिले.गौरी कन्हेरे यांनी मनोगत व्यक्त केले.प्राचार्य डॉ.जयप्रकाश दरगड यांच्या मार्गदर्शनातून सदरील वेबिनार संपन्न झाले.याप्रसंगी प्रा.संगीता जाजू,प्रा.मेघा पंडित,प्रा.शैलजा धुतेकर,प्रा.पुजा सोनसाळे,डॉ.रामशेट्टी शेटकार, वैष्णवी देवगावकर,सुरवसे राणी,ज्योती चिंडे,सुचिता बारबोले यांच्यासह प्राध्यापक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी असे एकूण 60 जण उपस्थित होते.
लातूर : येथील दयानंद विज्ञान महाविद्यालयात दि.12 जानेवारी 2022 रोजी युगपुरुष स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.सिद्धेश्वर बेल्लाळे यांनी राष्ट्रमाता जिजाऊ व थोरपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.माॅसाहेब जिजाऊ जन्मोत्सव व राष्ट्रीय युवा दिनाच्या त्यांनी शुभेच्छाही दिल्या.
       याप्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.दिलीप जगताप,कार्यालयीन अधीक्षक राजेश सेलूकर,संजय तिवारी,प्रा.हेमंत वरुडकर,बन्सी कांबळे,सुनील खडबडे,प्रदीप जावळे,गीता चौधरी,पोपट वाजपेयी,अमोल क्षिरसागर,रजनीकांत मदने यांच्यासह प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
लातूर : दिनांक 8 जानेवारी 2022 रोजी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ,नांदेड अंतर्गत दयानंद विज्ञान महाविद्यालय,लातूरच्या वतीने अ विभाग आंतर महाविद्यालयीन मुलींच्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन डॉ.विठ्ठल मोरे, उप संचालक,उच्च शिक्षण विभाग,नांदेड यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ.जे.एस.दरगड तसेच अजिंक्य सोनवणे,डॉ.वैशाली माडेकर,धनराज जोशी,महेंद्र गिरी,डाॅ.नितेश स्वामी,डॉ.अशोक वाघमारे,विजय हांडे,प्रा.रवी गळगे व इतर उपस्थित होते.मुलींच्या या क्रिकेट स्पर्धेमध्ये विभागातील एकूण सहा संघांनी सहभाग नोंदविला.या स्पर्धेत दयानंद वाणिज्य महाविद्यालयाने विजेतेपद प्राप्त केले तर दयानंद विज्ञान महाविद्यालयाच्या संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.तसेच दयानंद कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयाने तृतीय क्रमांक प्राप्त केला.या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी डॉ.महेश बेंबडे,प्रा.निशिकांत सदाफुले,ऋषिकेश मस्के,विकास निरपळ,आकाश ऐलाने व उमेश चव्हाण यांनी परिश्रम घेतले.
लातूर : येथील दयानंद विज्ञान महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभाग व औद्योगिक रसायनशास्त्र यांच्या संयुक्त विद्यमाने दि.06 जानेवारी 2022 रोजी ‘ काचेच्या प्रायोगिक वस्तुंचे प्रदर्शन आणि औद्योगिक उत्पादन प्रक्रिया पोस्टर सादरीकरणाचे  आयोजन करण्यात आले होते.सदरील प्रदर्शन व पोस्टर प्रेझेंटेशनचे उद्घाटन लातूर येथील शिक्षण अधिकारी तृप्ती अंधारे यांच्या हस्ते झाले.याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयप्रकाश दरगड,उपप्राचार्य डॉ.सिद्धेश्वर बेल्लाळे,रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ.युवराज सारणीकर,औद्योगिक रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ.आण्णाराव चौगुले,पदव्युत्तर  विभाग समन्वयक डॉ.जमन अनगुलवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
       याप्रसंगी शिक्षण अधिकारी तृप्ती अंधारे असे म्हणाल्या की, दयानंद विज्ञान महाविद्यालय हे नामांकित महाविद्यालय असून महाविद्यालयात अकरावी ते एम.एस्सीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी ग्लासवेअर साहित्याचे प्रदर्शन व पोस्टर प्रेझेंटेशनचे जे आयोजन करण्यात आलेले आहे,त्यातूनच विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक, प्रायोगिक,निष्कर्षात्मक,वैचारिक बुद्धी नक्कीच बळावेल.असेच प्रदर्शन शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी यापुढेही भरवावे,त्यातून सर्व स्तरातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होईल.विज्ञान, प्रात्यक्षिकांचे ज्ञान त्यांना मिळेल. त्यांच्या ज्ञानात निश्चित भर पडेल. 
        महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयप्रकाश दरगड,डॉ.युवराज सारणीकर आणि डॉ.आण्णाराव चौगुले यांनी रसायनशास्त्र व औद्योगिक रसायनशास्त्रासाठी लागणाऱ्या काचेच्या विविध प्रायोगिक वस्तुंचे प्रदर्शन आणि औद्योगिक उत्पादन प्रक्रिया पोस्टर सादरीकरण आयोजनामागची भूमिका सांगताना कोविड -19 काळात प्रत्यक्षरित्या ऑफलाइन पद्धतीने प्रात्यक्षिक होऊ शकले नाहीत.त्यामुळे बहुतांश विद्यार्थ्यांना ग्लासवेअरची माहिती नव्हती.तसेच विद्यार्थ्यांना ते हाताळण्याची कलाही अवगत नव्हती.यामुळे सदरील प्रदर्शनाचे आयोजन करण्याची आवश्यकता होती.ती पूर्ण करण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या उपक्रमाचा,प्रदर्शनाचा फायदा अकरावी ते एम.एस्सीच्या सर्व विद्यार्थ्यांना निश्चित होईल.
         सदरील ‘औद्योगिक उत्पादन प्रक्रिया पोस्टर सादरीकरणात रेशमा गोरे हिने प्रथम तर ऋतुजा वाघमारे यांनी द्वितीय आणि जीशान शेख व सुजित साळुंके यांनी तृतीय क्रमांक मिळवला.परीक्षक म्हणून प्रा.युसूफ पठाण यांनी काम पाहिले.याचबरोबर बी.एस्सी. रसायनशास्त्र प्रदर्शनांमध्ये नागटिळक विद्या व राजमाने विदुला,पिटले स्वप्नाली,कोरे नेहा व केसरे गीतांजली,एम.एस्सी. रसायनशास्त्रातून बिराजदार पल्लवी व रितू शिंदे,देशमुख अमर,लाटे मानसी व सरवदे मानसी यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवला.त्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.याप्रसंगी डॉ.नंदिनी कोरडे,प्रा.राहुल जाधव,डॉ.श्रेयस माहुरकर,डॉ.श्याम इबाते,डॉ.रवींद्र शिंदे, डॉ.एन.ए.केदार,प्रा.बी.डी.कमाले,प्रा.नवनाथ ढेकणे,प्रा.तांबोळी,प्रा.अक्षता माने,प्रा.भाग्यश्री काळे,प्रा.एम.मुंडे,महेश आकनगिरे,माधव मसलगे,एम.आर.माळगे,जोशी एल.बी.,जंगम बी.बी.,औद्योगिक रसायनशास्त्र मंडळातील कौस्तुभ पोटे,चेतन घोडके,बोरगावकर भूषण,वीरभद्र चेटके यांच्यासह प्राध्यापक,शिक्षकेत्तर कर्मचारी आणि रसायनशास्त्र व औद्योगिक रसायनशास्त्र मंडळातील पदाधिकारी,विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
लातूर : मधमाशी पालन व्यवसाय हा शेतीपूरक व्यवसाय आहे,तो व्यवसाय आपण आवर्जून केला पाहिजे.कारण मधमाशापासून मध मिळतो.मध हा औषधी गुणधर्म आहे‌.प्रत्येक माणसांनी मध आवर्जून खाल्ले पाहिजे.ते खाल्ल्यामुळे आपणास आजार जडत नाहीत.म्हणून दैनंदिन जीवनात नित्यनियमाने मधाचे सेवन केले पाहिजे.मध आणि मेण उत्पादनात करिअर केले पाहिजे.त्यात विद्यार्थ्यांना,प्रत्येक माणसांना अनेक संधी आहेत.मधमाशा,त्याचे प्रकार, मधमाशांचे विष,रॉयल जेली याविषयी संशोधन केले पाहिजे.त्याचबरोबर निसर्गचक्र आणि मानवी जीवनात मधमाशांना अनन्यसाधारण असे महत्त्व असून मधमाशामुळेच निसर्गाचे संतुलन व्यवस्थित राहते,असे प्रतिपादन चाकूर येथील गौरी नॅचरल फुडचे संचालक व मधमाशीपालन तज्ज्ञ दिनकर पाटील यांनी केले.
         येथील दयानंद विज्ञान महाविद्यालयातील प्राणिशास्त्र विभागाच्या वतीने दि.06 जाने.2022 रोजी  ‘ मधुमक्षिकापालन : महत्त्व व भविष्यातील संधी ‘ या विषयावर एक दिवसीय सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.सिद्धेश्वर बेल्लाळे होते.याप्रसंगी प्राणिशास्त्र विभाग प्रमुख व नॅक समन्वयक डॉ.रवींद्र सोळुंके,डॉ.रत्ना कीर्तने यांची प्रमुख उपस्थिती होती.
       उपप्राचार्य डॉ.सिद्धेश्वर बेल्लाळे यांनी अध्यक्षीय समारोपात सदरील सेमिनारसाठी शुभेच्छा दिल्या.प्रास्ताविक पल्लवी देशमुख यांनी केले तर आभार निखत सय्यद यांनी मानले.सूञसंचालन अंबिका हेंकरे यांनी केले.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयप्रकाश दरगड यांच्या मार्गदर्शनातून हा एक दिवसीय सेमिनार संपन्न झाला.याप्रसंगी डॉ.एस.डी.बोंडगे,प्रा.बळवंत सूर्यवंशी,प्रा.प्रमोद माने,प्रा.गणेश नोगझा,डॉ.एस.बी.जाधव,प्रा.
राजश्री शिंदे,डॉ.रामशेट्टी शेटकार,संतोष सूर्यवंशी,गोविंद सांगवे,शिंदे एल.बी.,शेख हक्कानी,श्री.धर्मापुरीकर,
अविनाश बोबडे,अंगद माने यांच्यासह प्राध्यापक,शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
लातूर : येथील दयानंद विज्ञान महाविद्यालयात दि.3 जानेवारी 2022 रोजी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयप्रकाश दरगड यांनी स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
           याप्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.दिलीप जगताप,कार्यालयीन अधीक्षक राजेश सेलूकर,दयानंद विधी महाविद्यालयाचे कार्यालयीन अधीक्षक धनराज जोशी,बन्सी कांबळे,संजय तिवारी,डॉ.रामशेट्टी शेटकार,डॉ.राहुल मोरे,विष्णू नाईकवाडे,सुनील खडबडे,गीता चौधरी,किशोर जाधव,प्रदीप जावळे,मोहसीन शेख,धीरज पारिख,सुनील राक्षे,बालाजी येमपूरे,पोपट वाजपाई,सुहास परवते,शर्मा,पवन शर्मा,रामराजे काळे,चेतन पाटील यांच्यासह प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.त्यांनीही विनम्र अभिवादन केले.
लातूर : येथील दयानंद विज्ञान महाविद्यालयातील संगणकशास्त्र विभाग आणि Aspiring करिअर, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 29 डिसेंबर 2021रोजी ‘ माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात नोकरी कसे मिळवायचे ‘ या विषयावर करिअर समुपदेशन कार्यक्रमाचे झुम ॲपच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.सिद्धेश्वर बेल्लाळे होते.याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सीड इन्फोटेक पुणे येथील सल्लागार,सीटीओ श्री.राजेश वर्तक,संगणकशास्त्र विभाग प्रमुख डॉ.रोहिणी शिंदे,कार्यक्रम समन्वयक प्रा.वैभव कुलकर्णी,संगणकशास्त्र विभागाच्या समन्वयक प्रा.संगीता जाजू यांची प्रमुख उपस्थिती होती.
         याप्रसंगी प्रमुख पाहुणे सीड इन्फोटेक पुणे येथील सल्लागार,सीटीओ राजेश वर्तक यांनी पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी आय.टी. क्षेत्रात नोकरी कसे मिळवायचे,त्यासाठी परिचयपत्र कसा तयार करायचा,कोणत्या काॅम्प्युटर लँग्वेजमध्ये कोणते सर्टिफिकेट कोर्सेस आहेत,त्यासाठी कशी तयारी करायची,मुलाखत कशी द्यायची याविषयीची सखोल अशी माहिती दिली.याचबरोबर एमएनसी कंपनीत प्रोग्रामर,डेव्हलपरची कशी आवश्यकता असते,त्यात संधी किती आहेत आणि त्यासाठी नवीन विद्यार्थ्यांचा शोध घेऊन निवडक विद्यार्थी कसे घेतले जातात,या सर्व प्रक्रियेचे सविस्तर असे मार्गदर्शन केले.
       अध्यक्षीय समारोपात उपप्राचार्य डॉ.सिद्धेश्वर बेल्लाळे यांनी विद्यार्थ्यांनी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून आय.टी. क्षेत्रात असलेल्या अनेक संधीचे सोने करून उज्ज्वल असे भविष्य घडवावे,असे आवाहन केले.
         कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.रोहिणी शिंदे यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार प्रा.वैभव कुलकर्णी यांनी मानले.प्रमुख पाहुण्याचा परिचय एमकेसीएलचे विभागीय समन्वयक महेश पत्रिके यांनी करून दिले.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयप्रकाश दरगड यांच्या मार्गदर्शनातून हा कार्यक्रम संपन्न झाला.याप्रसंगी सोलापूर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ.डी.मिश्रा,प्रा.निकिता शिंदे,प्रा.मंगेश सुगरे,प्रा.शुभांगी चिक्राळे,प्रा.कांचन कदम, प्रा.कृष्णा सारडा,प्रा.अशोक मालू यांच्यासह प्राध्यापक,शिक्षकेत्तर कर्मचारी आणि महाविद्यालयातील व सोलापूर विद्यापीठातील विद्यार्थीही उपस्थित होते.
दयानंद विज्ञान महाविद्यालयात ‘ सद्य:स्थिती आणि भविष्यातील जागतिक उद्योग परिस्थिती ‘ या विषयावर करिअर समुपदेशन सेमिनार 
 
 
लातूर : आज विज्ञान-तंत्रज्ञानाच्या युगात जागतिक स्तरावर उद्योगक्षेत्रातच नव्हे तर प्रत्येक क्षेत्रात संगणकाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे.बदलत्या काळानुसार संगणकशास्त्रातल्या संकल्पना,नवनवीन विकसित तंत्रज्ञान,सॉफ्टवेअर यांची माहिती विद्यार्थ्यांना असणे ही आधुनिक काळाची गरज आहे.म्हणूनच मायक्रोसाॅफ्ट एक्सेल ते मायक्रोसोफ्ट पॉवर बी आय हे आधुनिक तंत्रज्ञान,संगणकाचे अद्ययावत ज्ञान त्यांना असले पाहिजे.ॲलन ट्युरिंग,स्टीव्ह जॉब्ससारख्या व्यक्तींचे कार्य माहीत असले पाहिजे.याशिवाय ऑटोमोबाईल्स मशीनमध्ये संगणकाचा वापर करून विद्यार्थ्यांना वर्तमान आणि भविष्यकालीन आयुष्यात करिअर घडविता येते आणि यांञिकीकरणात संगणिकीकरणाची वृद्धी होणे ही आधुनिक काळाची गरज आहे, असे प्रतिपादन अभियांत्रिकी गुणवत्ता हमी अभियंता झेडएफ ग्रुप,अल्फडाॅॎर्फ जर्मनी येथील किरण पाटील यांनी केले.
       येथील दयानंद विज्ञान महाविद्यालयातील संगणकशास्त्र विभागाच्या वतीने दिनांक 29 डिसेंबर 2021 रोजी ‘ सद्य:स्थिती आणि भविष्यातील जागतिक उद्योग परिस्थिती ‘ या विषयावर विद्यार्थ्यांसाठी एक दिवसीय करिअर समुपदेशन सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी ते प्रमुख पाहुणे व साधन व्यक्ती म्हणून बोलत होते.अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयप्रकाश दरगड होते.याप्रसंगी उपप्राचार्य डॉ.सिद्धेश्वर बेल्लाळे, महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष गुणवंतराव पाटील हंगरगेकर,सेमिनार समन्वयक व संगणकशास्त्र विभाग प्रमुख डॉ.रोहिणी शिंदे,भौतिकशास्त्र विभाग प्रमुख डॉ.ललित ठाकरे,प्रा.संगीता जाजू यांची प्रमुख उपस्थिती होती.
         प्राचार्य डॉ.जयप्रकाश दरगड अध्यक्षीय समारोप करताना असे म्हणाले की,संगणकशास्त्र हा विषय विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा विषय आहे.कारण जागतिक स्तरावर संगणकाशिवाय पर्याय नाही.म्हणूनच विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शैक्षणिक अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतरही ज्ञान वृद्धिंगत व्हावे,उद्योग क्षेत्रातील जागतिक परिस्थिती कशी आहे आणि त्यात संगणकाचा वापर करून कशी प्रगती करता येईल,याविषयीचे कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये विकसित व्हावे,या उद्देशातून अशा करिअर समुपदेशन सेमिनारचे महाविद्यालयात सातत्याने आयोजन केले जाते,असे ते म्हणाले.
      गुणवंतराव पाटील यांनीही बदलत्या काळानुसार विद्यार्थ्यांनी संगणकाचे ज्ञान आत्मसात करून भारतातच नव्हे तर अमेरिका,जर्मनी अशा अनेक पाश्चात्त्य देशात जाऊन उद्योग आदी क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली पाहिजे आणि नक्कल न करता नव नवीन संशोधन करून नवनिर्मिती केली पाहिजे असे ते म्हणाले.
        प्रास्ताविक डॉ.रोहिणी शिंदे यांनी केले तर प्रा.कांचन कदम यांनी आभार मानले.सूञसंचालन प्रा.मंगेश सुगरे व प्रा.कृष्णा सारडा यांनी संयुक्तरित्या केले.प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा.संगीता जाजू यांनी करून दिले.याप्रसंगी प्रा.वैभव कुलकर्णी,प्रा.निकिता शिंदे,प्रा.शुभांगी चिक्राळे,डॉ.रामशेट्टी शेटकार,काशिनाथ पाटील,आदित्य खानापुरे,अक्षय कुलकर्णी,प्रियंका हिप्परकर, राजनंदिनी जाधव,रवी पाटील,नागटिळक यांच्यासह प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि 164 विद्यार्थी उपस्थित होते.
 
 
 
 लातूर : सध्याचे युग हे स्पर्धेचे युग असून या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून करिअर करावे.या दृष्टिकोनातून करिअर कट्टा उपक्रमांतर्गत विद्यार्थी व समन्वयक यांच्यासाठी अशा कार्यशाळेचे आयोजन करणे गरजेचे आहे.कारण महाराष्ट्र लोकसेवा आयोग व भारतीय प्रशासकीय सेवेच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षा,व्यवसायाभिमुख शिक्षणाचे सर्वांगीण ज्ञान होणे गरजेचे आहे.याचबरोबर करिअर कट्टा अंतर्गत महाराष्ट्रातील महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये प्रशासकीय सेवेमधील सहभागी आवश्यक स्पर्धा परीक्षेबद्दलची जाणीवजागृती वाढवणे आवश्यक आहे,त्यातूनच विद्यार्थ्यांचे भवितव्य उज्ज्वल होते,असे प्रतिपादन महाराष्ट्र माहिती सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष यशवंत शितोळे यांनी केले.
          येथील दयानंद विज्ञान महाविद्यालय व महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 27 डिसेंबर 2021 रोजी ‘ करिअर कट्टा उपक्रमांतर्गत विद्यार्थी व समन्वयक एक दिवसीय कार्यशाळे ‘ चे आयोजन करण्यात आले होते.यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयप्रकाश दरगड होते.याप्रसंगी दयानंद इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ.श्रीनिवास बुमरेला,दयानंद कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ.क्रांती सातपुते, करिअर कट्टयाचे लातूर जिल्हा समन्वयक डॉ.कोमल गोमारे,डॉ.चंद्रशेखर स्वामी,अविनाश चौधरी,रोहित उसनाळे,गोपाळ लोहिया,महेश बिराजदार,डॉ.राऊतराव शिवकुमार,प्रा.विवेक झंपले, डॉ.सोनी लक्ष्मीकांत,प्रा.शेख दगडू,डॉ.जाधव,डॉ.माने,प्रा.
लक्ष्मण यांची प्रमुख उपस्थिती होती.
       अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ.जयप्रकाश दरगड असे म्हणाले की,दयानंद विज्ञान महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी चर्चासत्र,कार्यशाळा आणि अशा विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते.करिअर कट्टा उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा,व्यवसायाभिमुख शिक्षण, शहरी,ग्रामीण विद्यार्थ्यांना उच्च पातळीचे शिक्षण,तज्ज्ञ मार्गदर्शकांचे ज्ञान,उद्योजकीय कौशल्य आणि करिअरच्या दृष्टीने सर्व क्षेत्रातील नवनवीन संधी उपलब्ध करुन देणे अशा या उद्देशातून कार्यशाळेचे आयोजन सातत्याने केले जाते.यातूनच विद्यार्थी घडतात.याचबरोबर दयानंद विज्ञान महाविद्यालयाने ऊर्जा व्यवस्थापन,पर्यावरण संरक्षण,सामाजिक कार्य, रुसाच्या क्षेत्रातील कार्य, गुणवत्तेचा लातूर पॅटर्न आदी बाबतीत उंच भरारी घेतली आहे.विद्यार्थी घडविणे हाच आमचा सर्वांगीण उद्देश आहे,असे ते म्हणाले.
    प्रास्ताविक डॉ.कोमल गोमारे यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार प्रा.श्वेता मदने यांनी मानले.याप्रसंगी दयानंद शिक्षण संस्थेच्या अंतर्गत असलेल्या महाविद्यालयातील प्राध्यापक, करिअर कट्टा समन्वयक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
लातूर : येथील दयानंद विज्ञान महाविद्यालयातील भाषा विभागाच्या वतीने भारताचे माजी पंतप्रधान स्व.अटलबिहारी वाजपेयी यांचा 25 डिसेंबर हा जन्मदिवस ‘ सुशासन दिन ‘(गुड गवर्नेस डे) म्हणून साजरा करण्यात आला.यावेळी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.दिलीप जगताप यांनी भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
        याप्रसंगी नॅक समन्वयक डॉ.रवींद्र सोळुंके,पर्यवेक्षक डॉ.मिलिंद माने,मराठी विभाग प्रमुख डॉ.रामशेट्टी शेटकार, प्रा.प्रमोद माने,प्रा.विजयकुमार मांदळे,रवी पाटील,नरसिंग जाधव,सुहास परवते,सन्मुख विकास,बालाजी पिटले यांच्यासह प्राध्यापक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.त्यांनीही विनम्र अभिवादन केले.
 
 
 
पोस्टर प्रेझेंटेशन,सेमिनार स्पर्धा आणि बी.एस्सी.व एम.एस्सी.प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत…
 
 लातूर : येथील दयानंद विज्ञान महाविद्यालयात दि. 22 डिसेंबर 2021 हा राष्ट्रीय गणित दिवस व सुप्रसिद्ध गणिततज्ज्ञ रामानुजन यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.या कार्यक्रमप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयप्रकाश दरगड,प्रमुख पाहुणे म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ,नांदेड येथील गणित विभागाचे माजी संचालक डॉ.जे.एन.साळुंके, नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालय,नांदेड येथील प्रा.बी.बी.कुलकर्णी,गणित विभाग प्रमुख व उपप्राचार्य डॉ.एस.एस.बेल्लाळे व डॉ.दिलीप जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती.
          याप्रसंगी डॉ.जे.एन.साळुंके असे म्हणाले की,सुप्रसिद्ध गणिततज्ज्ञ  रामानुजन यांचा जन्मदिवस जगभरात गणित दिन म्हणून साजरा केला जातो.कारण रामानुजन यांनी गणित,गणितातील सूत्रे,प्रमये दिली आणि आजही त्यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.विद्यार्थ्यांनी गणित हा दैनंदिन व्यवहारातला आणि करिअरच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा विषय असून त्यात उज्ज्वल असे भविष्य घडवावे असे ते म्हणाले.
     प्राचार्य डॉ.जयप्रकाश दरगड असे म्हणाले की,गणित या विषयाचे मानवी जीवनात अनन्यसाधारण महत्त्व असून मानवतेच्या विकासासाठी गणिताचे महत्त्व विद्यार्थी आणि लोकांमध्ये वाढविणे गरजेचे आहे.गणित हा कठीण विषय नसून तो समजून घेऊन सूत्र,संकल्पना आणि सिद्धांतांचा आकलनातून भवितव्य घडविणारा विषय आहे असे ते म्हणाले.
         सदरील गणित दिनाचे औचित्य साधून पोस्टर प्रेझेंटेशन,सेमिनार स्पर्धा आणि बी.एस्सी.व एम.एस्सी.प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत यांचे आयोजन करण्यात आले होते.पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेत चाकूरकर साक्षी सुरेंद्र हिने प्रथम,मिटापूरे सौरभ साहेबराव यांनी द्वितीय आणि पटेल इनास मकसूद हीने तृतीय क्रमांक मिळविला.सेमिनार स्पर्धेमध्ये सूर्यवंशी हेमा हिने प्रथम,जाधव गौरवी हिने द्वितीय आणि शिंदे आदिती व ओंमकार भारती यांनी संयुक्तरित्या तृतीय क्रमांक मिळविला.
         कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य डॉ.एस.एस.बेल्लाळे यांनी केले तर आभार प्रा.शिवदर्शन हेंगणे यांनी मानले.सूत्रसंचालन ऋतुजा भोसले व इन्सीया पटेल यांनी संयुक्तरित्या केले.याप्रसंगी प्रा.बी.ए.गाडवे,प्रा.पी.डी.भोसले,प्रा.प्रतिभा मलवाडे,अक्षय कुलकर्णी,गर्जे शशिकांत,राजू पांचाळ यांच्यासह प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
दयानंद विज्ञान महाविद्यालयात ‘ ऊर्जा संवर्धन व व्यवस्थापन ‘ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा
 
हँन्डमेड पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण 
 
लातूर : ऊर्जा संवर्धन करणे ही आधुनिक काळाची गरज असून ऊर्जेच्या क्षेत्रात जास्तीत जास्त संशोधन केले जावे.कारण ऊर्जा ही राष्ट्रीय संपत्ती असून तिचे संवर्धन केले पाहिजे.तसेच सर्वांनी पर्यावरण,सोलार एनर्जी संवर्धन व व्यवस्थापनासाठी पुढाकार घ्यावा.दयानंद विज्ञान महाविद्यालयाने ऊर्जा संवर्धनाचा राज्य शासनाचा जो प्रथम क्रमांक मिळविला त्याचप्रमाणे प्रेरणा घ्यावी,असे प्रतिपादन महाऊर्जाचे विभागीय महाव्यवस्थापक देविदास कुलकर्णी यांनी केले.
     येथील दयानंद विज्ञान महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभाग,पेट्रोलियम काॅन्जरवेशन रिसर्च असोसिएशन (पीसीआरए) आणि महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी (महाऊर्जा) यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 20 डिसेंबर 2021 रोजी ऊर्जा संवर्धन सप्ताहाचे औचित्य साधून ‘ ऊर्जा संवर्धन व व्यवस्थापन ‘ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयप्रकाश दरगड, उपप्राचार्य डॉ.एस.एस.बेल्लाळे,
वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ.चंद्रशेखर स्वामी, समन्वयक प्रा.अश्विनी कांबळे, किरण खमितकर व शुभम पिसाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
       यावेळी ऊर्जा लेखापरीक्षक केदार खमितकर साधन व्यक्ती म्हणून बोलताना असे म्हणाले की,आज विज्ञान तंत्रज्ञान आणि जागतिकीकरणाच्या बदलत्या युगात ऊर्जेचा वापर अधिकाधिक वाढलेला आहे.या ऊर्जेचा योग्य वेळी योग्य वापर केला पाहिजे.परंतु ऊर्जा बचत आणि व्यवस्थापनात बहुतांशजण साक्षर असूनही निरक्षर असल्यासारखे वागतात.फॅन,फ्रिज,इस्ञी,
संगणक,मोबाईल चार्जिंग,वाशिंग मशीन आदि विद्युत उपकरणांच्या अती वापरातून ऊर्जेचा अपव्यय करतात.म्हणूनच ‘ बटन दबाओ बिजली बचाओ ‘ याचा स्वीकार करून स्वतःच्या घरापासून विजेची बचत केली पाहिजे.ऊर्जेचे मोजमाप, पर्यावरणाचे संवर्धन आणि प्लॅस्टिकचा कमीत कमी वापर, इंधन बचत,योग्य बल्बचा वापर अशा अनेक बाबींतून भारताला आत्मनिर्भर बनवत देशहित,राष्ट्रहित जोपासत ऊर्जा या राष्ट्रीय संपत्तीचे संवर्धन व व्यवस्थापन करण्यासाठी विद्यार्थी,समाज आणि प्रत्येक भारतीय नागरिकांनी पुढे पाऊल टाकले पाहिजे,असे ते म्हणाले.
    उपप्राचार्य डॉ.एस.एस.बेल्लाळे यांनी ऊर्जा संवर्धनासाठी विद्यार्थ्यांनी स्वतःच्या घरापासून ऊर्जेची बचत करून घरातील व्यक्ती,समाज, गाव आणि देशपातळीवर जनजागृती केली पाहिजे व ऊर्जा संवर्धनासाठी हातभार लावला पाहिजे.तसेच पोस्टर प्रेझेंटेशन मध्ये सहभाग नोंदविलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
        कार्यशाळेचे प्रास्ताविक डॉ.चंद्रशेखर स्वामी यांनी केले तर आभार प्रा.अश्विनी कांबळे यांनी मानले.सूत्रसंचालन प्रा.निकिता सुडे यांनी केले व प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा.माधुरी देशमुख यांनी करून दिला.ऊर्जा संवर्धन सप्ताहाच्या निमित्ताने हॅन्डमेड पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धा घेण्यात आली होती.या स्पर्धेत राजमाने विदुला हिने प्रथम,शिंदे आदिती यांनी द्वितीय आणि खोडसे ऋतुजा हिने तृतीय क्रमांक मिळविला.या स्पर्धेत एकूण 23 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून ऊर्जा संवर्धन व व्यवस्थापनावर पोस्टर प्रेझेंटेशन केले.या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून डॉ.विश्वनाथ मोटे,डॉ.रोहिणी शिंदे,डॉ.कोमल गोमारे यांनी काम पाहिले.या स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस व प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी प्रा.शिवाजी आळणे,डॉ.मनीषा गुरमे,प्रा.संतोषी कहाळेकर,पूजा पाटील,नागनाथ भालेराव,तेजस काळे,अक्षय कुलकर्णी,मोहसीन शेख यांनी परिश्रम घेतले.याप्रसंगी डॉ.रामशेट्टी शेटकार यांच्यासह प्राध्यापक,शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
 
 
 
लातूर : येथील दयानंद विज्ञान महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र व जैवतंत्रज्ञान विभागाच्या संयुक्त विद्यमाने दि.18 डिसेंबर 2021 रोजी ‘ बायोइन्स्ट्रुमेंटेशन तंत्रज्ञान  ‘ या विषयावर एक दिवसीय ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयप्रकाश दरगड होते.याप्रसंगी प्रमुख पाहुणे व साधन व्यक्ती म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ,सोलापूर येथील डॉ.सुहास टिकोळे व डॉ.श्रीपाद सुरवसे,उपप्राचार्य डॉ.एस.एस.बेल्लाळे,विभाग प्रमुख डॉ.राहुल मोरे,कार्यशाळा समन्वयक डॉ.कोमल गोमारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
  ‌      कार्यशाळेच्या प्रथम सत्रात डॉ.श्रीपाद सुरवसे यांनी रासायनिक पृथक्करणाच्या एनएमआर,एचपीएलसी,
जीसीएमसी,एफटीआयआर,
एएएस आणि एक्सआरडी पद्धती समजावून सांगितल्या.याचबरोबर या उपकरणाच्या वापरामुळे ट्रेस पातळी आणि पाण्यातील व अन्नातील कीटकनाशक,ओमेटसाईड अनुज्ञेय नसलेले रंग व कृत्रिम साखर याचे विश्लेषण करता येते याचीही माहिती दिली.
         द्वितीय सत्रामध्ये डॉ.सुहास  टिकोळे यांनी रसायनशास्त्रामध्ये एनएमआर सूक्ष्मतरंगाची माहिती दिली.या उपकरणांचा वापर प्रथिनांची रचना,अमिनो ॲसिड प्रोफाईल,अन्नपदार्थातील पाण्याची गतिशीलता निश्चित करण्यासाठी केला जातो.याशिवाय खाद्यपदार्थामधील मेटाबोलाईट्स ओळखण्यासाठी केला जातो,हे व्हिडिओच्या माध्यमातून आणि प्रेझेंटेशनद्वारे समजावून सांगितले.
        प्राचार्य डॉ.जयप्रकाश दरगड यांनी विद्यार्थ्यांचे तांत्रिक व सर्वांगीण ज्ञान सक्षम बनविण्यासाठी आणि शास्त्रीय प्रयोगासाठी लागणाऱ्या साधनांची ओळख विद्यार्थ्यांना करून देण्यासाठी महाविद्यालयात सातत्याने अशा कार्यशाळा,चर्चासत्राचे आयोजन  केले जाते असे ते म्हणाले. हे तंत्रज्ञान रसायनशास्त्र,भौतिकशास्त्र, गणितशास्त्र,जैवंत्रज्ञानशास्त्र, औषधीशास्त्र इतर अनेक वैज्ञानिक शाखेत याचा अनन्यसाधारण उपयोग विविध संशोधनासाठी उपयोग केला जातो. कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी सूक्ष्मजीवशास्त्र व जैवतंत्रज्ञान विभाग प्रमुख डॉ.राहुल मोरे यांनी उपकरणाचे सुलभ कौशल्य आत्मसात केल्यानंतर विद्यार्थ्यांना भारताबाहेर जाऊन पुढील शिक्षण घेता येईल आणि या कार्यशाळेतील ज्ञानाचा निश्चित फायदा होईल असे ते म्हणाले.
          प्रास्ताविक डॉ.कोमल गोमारे यांनी केले तर आभार कार्यशाळा सहसमन्वयक प्रा.अवंती बिडकर यांनी मानले.सूत्रसंचालन प्रा.श्वेता मदने यांनी केले.या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी प्रा.स्वप्नाली सावळे,प्रा.संकेत बनसोडे,डॉ.रामशेट्टी शेटकार,चित्ते,पाटोळे,मदने,सूर्यवंशी यांनीही परिश्रम घेतले.या कार्यशाळेसाठी दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी,उपाध्यक्ष अरविंदराव सोनवणे,सचिव रमेश बियाणी, संयुक्त सचिव सुरेश जैन यांनीही शुभेच्छा दिल्या.या कार्यशाळेसाठी पुणे,वडाळा, रेणापूर,परभणी,लातूर अशा विविधांगी महाविद्यालयातील विद्यार्थी यांच्यासह महाविद्यालयातील विभाग प्रमुख, प्राध्यापक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.
लातूर : येथील दयानंद विज्ञान महाविद्यालयातील गणित विभाग व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ,नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने दि.18 डिसेंबर 2021 रोजी जिल्हास्तरीय गणित प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयप्रकाश दरगड,स्पर्धा समन्वयक व उपप्राचार्य डॉ.एस.एस.बेल्लाळे,नॅक समन्वयक डॉ.रवींद्र सोळुंके,डॉ.चंद्रशेखर स्वामी,डॉ.महादेव पंडगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
           या स्पर्धेत जिल्ह्यातील विविध शाळा,महाविद्यालयांनी सहभाग नोंदविलेला होता.यामध्ये संत तुकाराम नॅशनल मॉडेल स्कूल,लातूर यांचा प्रथम क्रमांक आला तर ख्राइस्त इंटरनॅशनल स्कूल,अहमदपूर यांचा दुसरा आणि पोतदार इंटरनॅशनल स्कूल,लातूर यांनी तृतीय क्रमांक मिळवला.या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्रा.वडूलकर रघुनाथ,प्रा.शिरसाठ संजीव,प्रा.बापू गाढवे यांनी काम पाहिले.
          ही स्पर्धा आयोजित करण्यासाठी राष्ट्रीय पातळीवरील डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी डिपार्टमेंट ऑफ इंडिया यांच्यामार्फत आर्थिक सहाय्य व पारितोषिक दिले जाते.सदरील स्पर्धा बक्षीस वितरणप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक,विद्यार्थी आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.या स्पर्धेसाठी हिंगणे शिवदर्शन,पवन भोसले,अक्षय कुलकर्णी यांनीही परिश्रम घेतले.
लातूर : ऊर्जा ही मानवी जीवनाचा अविभाज्य घटक असून त्याची बचत होणे अत्यंत आवश्यक आहे.राज्याच्या महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण अर्थात महाऊर्जा या संस्थेतर्फे विविध योजनाही राबविल्या जातात.या ऊर्जा संवर्धनात दयानंद विज्ञान महाविद्यालय अग्रेसर असे काम करत असल्यामुळे महाविद्यालयास महाराष्ट्र शासनाचा राज्यस्तरीय ऊर्जा संवर्धन प्रथम पुरस्कार नुकताच प्राप्त झालेला आहे.दिनांक 14 ते 20 डिसेंबर 2021 ऊर्जा सप्ताहाच्या निमित्ताने लातूर येथील महाऊर्जा कार्यालय यांच्या वतीने आयोजित रॅलीत दयानंद विज्ञान महाविद्यालयाने शैक्षणिक क्षेत्रातील ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून पुढाकार घेतला.या महाउर्जेच्या ऊर्जा संवर्धन चिञरथाचा हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयप्रकाश दरगड व महाऊर्जा कार्यालयातील विभागीय महाव्यवस्थापक देवीदास कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला.याप्रसंगी उपप्राचार्य डॉ.एस.एस.बेल्लाळे,एनर्जी ऑडिटर केदार खमितकर,किरण खमितकर,रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ.श्रेयस माहुरकर,प्रा.राहुल जाधव,राष्ट्रीय छात्र सेना कॅप्टन डॉ.विजेंद्र चौधरी,डॉ.कोमल गोमारे,डॉ.ललित ठाकरे,प्रा.श्वेता मदने यांची प्रमुख उपस्थित होती.
            याप्रसंगी देवीदास कुलकर्णी असे म्हणाले की,ऊर्जा संवर्धन करणे ही आधुनिक काळाची गरज असून त्यासाठी सर्वांनी एकदिलाने आणि एकजुटीने पुढे पाऊल टाकले पाहिजे.ऊर्जेची बचत करून राष्ट्रहित साधले पाहिजे.ऊर्जा संवर्धनासाठी अशाच जनजागृतीचे आयोजन केले पाहिजे.यातच देशहित,समाजहित आहे.
              प्राचार्य डॉ.जयप्रकाश दरगड असे म्हणाले की,दयानंद विज्ञान महाविद्यालय ऊर्जा संवर्धन,पर्यावरण आणि वसुंधरेच्या संरक्षणासाठी नेहमी पुढाकार घेते.राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेना अशा सर्व विद्यार्थ्यांच्या मार्फत ऊर्जा संवर्धन रॅली,ऊर्जा बचतीची प्रतिज्ञा,संकल्प करून ते कृतीत उतरवले जाते.महाविद्यालयात विविधकार्यशाळा,चर्चासत्र घेऊन विद्यार्थी,प्राध्यापक,कर्मचारी आणि समाजजीवनात ऊर्जा आणि पर्यावरण संवर्धनासाठी जनजागृती केली जाते.त्यासाठी महाविद्यालय नेहमीच कार्यशील असते.याचबरोबर राष्ट्राच्या विकासाकरिता ऊर्जेचा अपव्यय होऊ न देता त्याचा योग्य वापर केला पाहिजे,ती प्रत्येक नागरिकांची जबाबदारी,आद्यकर्तव्य आहे असे ते म्हणाले.
        याप्रसंगी महाऊर्जा कार्यालयातील प्रकल्प अधिकारी पल्लवी शेळके, प्रेरणा नलावडे,पुजा धुमाळ, सुप्रिया आवडोबा,किरण जोशी,शुभम पिसाळ,अश्विन वाडीभस्मे,प्रणय बावणे,अंजली जाधव, ऋषिकेश जाधव,दयानंद विज्ञान महाविद्यालयाचे एनएसएस,एनसीसीचेविद्यार्थी,प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.देवीदास कुलकर्णी यांनी ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयप्रकाश दरगड यांचा सत्कार केला.या रॅलीसाठी दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी,सचिव रमेश बियाणी यांच्यासह डॉ.रत्ना कीर्तने,डॉ.रोहिणी शिंदे,डॉ.विश्वनाथ मोटे या ऊर्जा व्यवस्थापन व एनर्जी ऑडिट पोर्टफोलिओतील सदस्यांनीही शुभेच्छा दिल्या व अभिनंदनही केले.
लातूर : येथील दयानंद विज्ञान महाविद्यालयास महाराष्ट्र शासन अर्थात महाराष्ट्र ऊर्जा विकास एजन्सीचा राज्यस्तरीय ऊर्जा संवर्धनचा प्रथम पुरस्कार मिळालेला आहे.हा पुरस्कार 14 डिसेंबर 2021 रोजी राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवसाचे औचित्य साधून घोषित करण्यात आला.या दिनानिमित्त महाविद्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमास  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयप्रकाश दरगड,प्रमुख पाहुणे एनर्जी ऑडिटर केदार खमितकर,किरण खमितकर,उपप्राचार्य डॉ.एस.एस.बेल्लाळे,डॉ.ललित ठाकरे,डॉ.आण्णाराव चौगुले,डॉ.कोमल गोमारे,डॉ.राहुल मोरे,डॉ.महादेव पंडगे,प्रा.श्वेता मदने,प्रा.स्वप्नाली सावळे,प्रा.शैलजा धुतेकर,प्रा.संकेत बनसोडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
       याप्रसंगी एनर्जी ऑडिटर केदार खमितकर असे म्हणाले की,ऊर्जा संवर्धन करणे आपले राष्ट्रीय कर्तव्य असून प्रत्येक भारतीय नागरिकांनी ऊर्जेचा अपव्यय टाळून ऊर्जा संवर्धनाचे काम स्वतःच्या घरापासून केले पाहिजे.ऊर्जेचे संवर्धन करणे ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे,त्यासंदर्भात जनजागृती करणे हे आपले परमकर्तव्य आहे. सद्यःस्थितीत ऊर्जा संवर्धनाबाबत जागरूक नाही झालो तर देशाचा सर्वांगीण विकास होणार नाही आणि म्हणूनच ऊर्जा संवर्धन करणे ही आधुनिक काळाची गरज आहे,असे ते म्हणाले. 
        सदरील राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिनाच्या निमित्ताने ऊर्जा बचतीसाठी विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी म्हणून सलग सात दिवस ऊर्जा संवर्धनाची प्रतिज्ञा घेण्याचा संकल्प केला आणि त्यानुसार ऊर्जा बचतीची सामूहिक प्रतिज्ञाही घेतली.
        महाराष्ट्र शासनाचा राज्यस्तरीय ऊर्जा संवर्धनचा प्रथम पुरस्कार मिळाल्याबद्दल दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी,उपाध्यक्ष अरविंदराव सोनवणे,सचिव रमेश बियाणी,संयुक्त सचिव सुरेश जैन यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयप्रकाश दरगड व सर्व टीमचे अभिनंदन केले.त्याचबरोबर सर्व विभाग प्रमुख,प्राध्यापक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनीही सर्वांचे अभिनंदन व कौतुक केले.
लातूर : येथील दयानंद विज्ञान महाविद्यालयात महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘ करिअर कट्टा युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी ‘ या फलकाचे विमोचन दिनांक 11 डिसेंबर 2021 रोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयप्रकाश दरगड यांच्या शुभहस्ते करण्यात आले.याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.एस.एस.बेल्लाळे,करिअर कट्टयाचे महाविद्यालयाचे समन्वयक व लातूर जिल्हा समन्वयक डॉ.कोमल गोमारे,इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी करिअर कट्टयाचे समन्वयक श्री.चौधरी व श्री.उसनाळे,डॉ.राहुल मोरे,डॉ.महेश कराळे,प्रा.श्वेता मदने,प्रा.स्वप्नाली सावळे,प्रा.अवंती बिडकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
 
      सदरील करिअर कट्टा उपक्रमातून यूपीएससी,एमपीएससी,सायबर सेक्युरिटी,ई-फायलिंग स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे.तसेच या उपक्रमाद्वारे महाविद्यालयीन स्तरावर उद्योजकीय कौशल्य वाढीस लागावे आणि विविध शासकीय उपक्रमाची माहिती व मार्गदर्शन मिळावे या उद्देशातून 365 दिवस चालणाऱ्या या उपक्रमात अनेक तज्ज्ञ आयएएस,आयपीएस,आय आरएस,आयएफएस याशिवाय उद्योजक आपल्या भेटीला यामध्ये बँकिंग अधिकारी,सल्लागार यांचेही मार्गदर्शन लाभणार आहे.त्याचबरोबर वाणिज्य शाखेसाठी ई-फायलिंग कोर्स,तांत्रिक शाखासाठी सायबर सेक्युरिटी कोर्स आणि फाऊंडेशन कोर्स-स्पर्धा परीक्षा असे विविधांगी उपक्रम राबवले जाणार आहेत,अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयप्रकाश दरगड व करिअर कट्टयाचे जिल्हा समन्वयक डॉ.कोमल गोमारे यांनी दिली.यावेळी मयूरी जाधव,स्नेहल पाटील व इतर विद्यार्थी,सुनील राक्षे,पाटोळे,विशाल आदि उपस्थित होते.या करिअर कट्टयासाठी महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख,प्राध्यापक,कार्यालयीन अधीक्षक राजेश सेलूकर आणि इतर शिक्षकेत्तर कर्मचारी आदींनी शुभेच्छा दिल्या व अभिनंदनही केले.
लातूर : दयानंद विज्ञान महाविद्यालयामध्ये क्रीडा विभागाच्या वतीने दिनांक 6 आणि 8 डिसेंबर 2021 रोजी आंतर विभाग बॅडमिंटन मुले व मुली स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेमध्ये विभागातील एकूण 18 संघांनी सहभाग नोंदविला.अ विभागीय बॅडमिंटन स्पर्धेत मुलांच्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र महाविद्यालय,निलंगा,महात्मा बसवेश्वर महाविद्यालय,लातूर व दयानंद विज्ञान महाविद्यालय,लातूर यांनी अनुक्रमे प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केला.तसेच मुलींच्या स्पर्धेमध्ये महात्मा बसवेश्वर महाविद्यालय,लातूर, कॉक्सिट महाविद्यालय,लातूर व दयानंद विज्ञान महाविद्यालय,लातूर यांनी अनुक्रमे प्रथम,द्वितीय आणि तृतीय क्रमांक प्राप्त केला.त्याचबरोबर आंतर विभागीय बॅडमिंटन स्पर्धेमध्ये विद्यापीठातील एकूण चार विभागाच्या आठ संघांनी सहभाग नोंदविला.विद्यापीठस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेमध्ये मुलांच्या स्पर्धेत अ विभाग क विभाग ड विभाग यांनी अनुक्रमे प्रथम,द्वितीय आणि तृतीय क्रमांक प्राप्त केला.तसेच मुलींच्या बॅडमिंटन स्पर्धेमध्ये क विभाग,अ विभाग आणि ड विभाग यांनी अनुक्रमे प्रथम,द्वितीय आणि तृतीय क्रमांक प्राप्त केला.सदरील स्पर्धेतून विद्यापीठाचे संघ निवडण्यात आले.या स्पर्धेचे उद्घाटन दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी यांच्या हस्ते करण्यात आले होते.
 
    ‌    याप्रसंगी दयानंद शिक्षण संस्थेचे सचिव रमेश बियाणी, संयुक्त सचिव सुरेश जैन,आशिष बाजपाई,शांतीलाल कुचेरिया,अशोक पाटील,हेमंत वोरा,चैतन्य भार्गव,निखील राठी,प्राचार्य डॉ.जे.एस.दरगड, प्राचार्य डॉ.एस.पी.गायकवाड,डॉ.पुनम नथानी,डॉ.पी.एन.देशमुख,डॉ.
दीपक बच्चेवार,डॉ.भास्कर रेड्डी इत्यादी उपस्थित होते.सदरील स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रा.डाॅ.महेश बेंबडे,प्रा.निशिकांत सदाफुले,प्रा.ऋषिकेश मस्के आदींनी परिश्रम घेतले.
लातूर : येथील दयानंद विज्ञान महाविद्यालयात संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.एस.एस.बेल्लाळे यांनी संत संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
 
        याप्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.दिलीप जगताप,पर्यवेक्षक डॉ.मिलिंद माने,कार्यालयीन अधीक्षक राजेश सेलूकर,प्रा.अमोल सांजेकर,प्रा.गोपालअवस्थी,प्रा.बी.एम.तांबाळकर,प्रा.दत्तात्रय कुलकर्णी,प्रा.राहुल जाधव,बन्सी कांबळे,सुनील खडबडे,विनोद घार,गीता चौधरी,मोहसिन शेख,किशोर जाधव,सुजित अपसिंगेकर आदींसह प्राध्यापक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
लातूर : येथील दयानंद विज्ञान महाविद्यालयाचा विद्यार्थी सचिन गुरुडेस स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या विज्ञान पदवी परीक्षेत सर्वप्रथम आल्याबद्दल रोख रक्कम,प्रशस्तीपत्रासह सुवर्णपदकाने नांदेडचे विशेष पोलीस महानिरिक्षक निसार तांबोळी व विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.उध्दव भोसले यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
 
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभागृहात गुरुवारी पार पडलेल्या पदक पारितोषिक वितरण समारंभात हा सन्मान करण्यात आला.यावेळी हुतात्मा संभाजी लक्ष्मण कांबळे यांच्या स्मरणार्थ दिले जाणारे सुवर्णपदक व रोख धनादेश देऊन त्यास गौरविण्यात आले.तसेच विज्ञान पदवी परीक्षेत सर्वप्रथम आल्याबद्दल डॉ.भीमराव पिंगळे यांच्याकडूनही रोख रकमेचा धनादेश त्यास सुपुर्द करण्यात आला.याप्रसंगी प्र.कुलगुरू डॉ.जोगेंद्रसिंह बिसेन,कुलसचिव डॉ.सर्जेराव शिंदे,पालक तुकाराम गुरुडे व अन्य मान्यवरांची उपस्थिती होती. 
 
या यशाबददल दयानंद विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयप्रकाश दरगड,उपप्राचार्य डॉ.एस.एस.बेल्लाळे,सर्व प्राध्यापक वृंद आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्यातर्फेही अभिनंदन करण्यात आले.
लातूर : येथील दयानंद विज्ञान महाविद्यालयात भाषा विभाग व कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने 6 डिसेंबर 2021 रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,महामानव,बोधिसत्व,ज्ञानसूर्य,
भारतरत्न,परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.सिद्धेश्वर बेल्लाळे यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.मा.उपसचिव,गृह विभाग व मा.जिल्हाधिकारी यांच्या शासन परिपत्रकातील मार्गदर्शक सूचनानुसार कोविड-19 नियमाचे पालन करीत सर्वांनी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन केले.
 
    याप्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.दिलीप जगताप,कार्यालयीन अधीक्षक राजेश सेलूकर,बन्सी कांबळे,संजय तिवारी,डॉ.रामशेट्टी शेटकार,प्रा.मंजुषा कदम,प्रा.विजयकुमार मांदळे, सुनील खडबडे,विष्णू नाईकवाडे,मोहसिन शेख,धिरज पारिख,पोपट वाजपाई,सुदामा सातपुते,रामचंद्र सलगर,सन्मुखराव,बाबा बचाटे आदींसह प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
 
 
 
लातूर : येथील दयानंद विज्ञान महाविद्यालयास नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.सर्जेराव शिंदे यांनी दि.04 डिसेंबर 2021 रोजी सदिच्छा भेट दिली.यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयप्रकाश दरगड यांच्या हस्ते त्यांचा स्नेहपूर्वक शाल व बुके देऊन सत्कार करण्यात आला.कुलसचिव डॉ.सर्जेराव शिंदे यांनी दयानंद विज्ञान महाविद्यालयाची यशस्वी गुणवत्तेची परंपरा, महाविद्यालयाचे शिस्तबद्ध कामकाज,सुसज्ज परिसर,क्रीडा मैदान आदि बाबीविषयी कौतुक केले.
 
        याप्रसंगी उपप्राचार्य डॉ.एस.एस.बेल्लाळे,नॅक समन्वयक डॉ.रवींद्र सोळुंके,डॉ.युवराज सारणीकर,डॉ.चंद्रशेखर स्वामी,डॉ.ललित ठाकरे,डॉ.आण्णाराव चौगुले,ग्रंथपाल प्रा.किरण भिसे,प्रा.मेघा पंडित,डॉ.गजानन बने,डॉ.रामशेट्टी शेटकार आदि विभाग प्रमुखासह डॉ.चौधरी, प्राध्यापक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
लातूर : येथील दयानंद विज्ञान महाविद्यालयाच्या शैक्षणिक वर्ष 2019-20 च्या ‘ उन्मेष ‘ वार्षिकांकास नांदेड येथील विद्यार्थी विकास विभाग,स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा उत्कृष्ट वार्षिकांक म्हणून उत्तेजनार्थ (विभागून) पारितोषिक मिळाले.दि.2 डिसेंबर 2021 रोजी विद्यापीठ वर्धापन दिनानिमित्त विद्यापीठाच्या अधिसभागृहात आयोजित करण्यात आलेल्या पारितोषिक वितरण कार्यक्रमाच्या प्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.उद्धव भोसले,प्र-कुलगुरू डॉ.जोगेंद्रसिंह बिसेन,कुलसचिव डॉ.सर्जेराव शिंदे,संचालक डॉ.ज्ञानोबा मुंढे व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत मुख्य संपादक प्रा.मेघा पंडित यांना प्रमाणपत्र,सन्मानचिन्ह व धनादेश देऊन महाविद्यालयाचा गौरव करण्यात आला.
 
        सदरील पारितोषिक मिळाल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयप्रकाश दरगड व उपप्राचार्य डॉ.एस.एस.बेल्लाळे,नॅक समन्वयक डॉ.रवींद्र सोळुंके,डॉ.युवराज सारणीकर यांनी मुख्य संपादक व इंग्रजी विभाग प्रमुख प्रा.मेघा पंडित आणि संपादक मंडळातील डॉ.चंद्रशेखर स्वामी,डॉ.गजानन बने,डॉ.रामशेट्टी शेटकार,डॉ.विजेंद्र चौधरी,प्रा.मनीषा बाजपाई,प्रा.प्रकाश बांगड,प्रा.दीपक माने,विद्यार्थी संपादक राधिका कराड,पूजा थेटे,गंगाधर राजपांगे आदींचे अभिनंदन केले.याचबरोबर दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी,उपाध्यक्ष अरविंदराव सोनवणे,सचिव रमेश बियाणी,संयुक्त सचिव सुरेश जैन यांनीही उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयप्रकाश दरगड,उपप्राचार्य डॉ.एस.एस.बेल्लाळे,मुख्य संपादक प्रा.मेघा पंडित,सर्व संपादक मंडळ व कार्यालयीन अधीक्षक राजेश सेलूकर,सुधीर तिवारी आदिंसह सर्व विभाग प्रमुख,प्राध्यापक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन व कौतुक केले.
दयानंद विज्ञान महाविद्यालयात ‘ पर्यावरणाची जोपासना ‘ या विषयावर एक दिवसीय ऑनलाईन वेबिनार 
 
लातूर : जागतिकीकरण आणि विज्ञानतंत्रज्ञानातील प्रगतीमुळे समाजजीवन खूपच बदलत चालले आहे.या बदलत्या युगात ध्वनी,हवा,जल प्रदूषणाचे प्रमाण वाढले आहे.गाव,शहरे पोखरली जात आहेत.माणसाचे आरोग्यही धोक्यात आले आहे.आयुर्मान कमी होऊन लोक मृत्युमुखी पडत आहेत.म्हणून प्लाॅस्टिकचा वापर व अमर्याद वृक्षतोड ही थांबलीच पाहिजे.निसर्गाचा समतोल साधला पाहिजे.आजूबाजूचा परिसर स्वच्छ आणि सुंदर असेल आणि जंगले चांगली असतील तरच माणसाचे जीवनमान आनंदी होईल,अन्यथा नाही.म्हणूनच झाडे लावणे व झाडे जगवण्याबरोबरच पर्यावरणाची जोपासना करा आणि आरोग्य सांभाळा,असे प्रतिपादन लातूर येथील वृक्षमित्र सूपर्ण जगताप यांनी केले.
 
        येथील दयानंद विज्ञान महाविद्यालयात 19 ते 25 नोव्हेंबर 2021′ कौमी एकता सप्ताहा’च्या निमित्ताने ‘ पर्यावरणाची जोपासणा ‘ या विषयावर एक दिवसीय ऑनलाईन वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ.युवराज सारणीकर होते.याप्रसंगी वेबिनार समन्वयक डॉ.रवींद्र शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
 
        अध्यक्षीय समारोप करताना डॉ.युवराज सारणीकर असे म्हणाले की,सध्याच्या युगात बदलत्या जीवनशैलीमुळे माणसाच्या गरजा ह्या वाढल्या आहेत.सुख-समाधानानेयुक्त  आभासी जीवनात माणूस रममाण होत चालला आहे.महागडे फर्निचर,सागवानाचा वाढता वापर यामुळे वृक्षतोड होत आहे.प्रदूषण, कार्बनडायॉक्साईडचे प्रमाण वाढले आहे.त्याचा परिणाम मानवी आरोग्य,पशुपक्षी आणि प्राण्यांच्या जीवनावर होत आहे.प्राणी,पक्षांचे थवे जास्त दिसत नाहीत.म्हणूनच शासन स्तरावर कठोर नियम झाले पाहिजेत,त्याची योग्य अंमलबजावणी झाली पाहिजे.वृक्षप्रेमी,वृक्षमित्रांनी आपली वृक्ष चळवळ वृद्धिंगत केली पाहिजे आणि समाजानेही त्यात पुढाकार घेतला पाहिजे,असे ते म्हणाले.
 
     प्रमुख पाहुण्यांचा परिचय व प्रास्ताविक डॉ.रवींद्र शिंदे यांनी केले तर आभार प्रा.भाग्यश्री काळे यांनी मानले.सूत्रसंचालन प्रा.अक्षता माने यांनी केले.सदरील वेबिनारसाठी प्राचार्य डॉ.जयप्रकाश दरगड व उपप्राचार्य डॉ.एस.एस.बेल्लाळे यांचे मार्गदर्शन लाभले.याप्रसंगी डॉ.नंदिनी कोरडे,डॉ.जमन अनगुलवार,डॉ.श्रेयस माहुरकर,प्रा.राहुल जाधव,डॉ.श्याम इबाते,डॉ.आण्णाराव चौगुले, डॉ.रामशेट्टी शेटकार,डॉ.तांबोळी,प्रा.नवनाथ ढेकणे,प्रा.बी.डी.कमाले,प्रा.एस.डी.राखे,प्रा.मनीषा मुंढे,महेश आकनगिरे,चेतन पाटील,रामराजे काळे आदींसह प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
लातूर : पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रियांना नेहमीच दुय्यम दर्जाची वागणूक दिली गेली आहे.पूर्वीपासून त्यांच्यावर अन्याय -अत्याचार होत आले आहेत.पण बदलत्या काळानुसार आज एकविसाव्या शतकातील स्त्री ही कौटुंबिक पातळीपासून ते राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत त्यांनी उंच भरारी घेतलेली आहे.इंदिरा गांधी,आनंदीबाई जोशी,अहिल्याबाई होळकर,राजमाता जिजाऊ,अरुंधती भट्टाचार्य,कल्पना चावला,सुमित्रा महाजन,सुषमा स्वराज आदि स्ञियांनी राष्ट्र उभारणीत आणि समाजाच्या जडणघडणीत उल्लेखनीय असे कार्य केलेले आहे.आज स्ञिया ह्या सामाजिक,आर्थिक,राजकीय,
शैक्षणिक,सांस्कृतिक अशा  राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर पुरुषांच्या बरोबरीने कार्य करीत आहेत.त्यांना सर्वांनी समाजजीवनात दुय्यम स्थान न देता नेहमी आदराचे स्थान द्यावे,असे प्रतिपादन मंजुश्री घोणे यांनी केले.
 
          येथील दयानंद विज्ञान महाविद्यालयात 19 ते 25 नोव्हेंबर 2021 कौमी सप्ताह  ‘महिला दिना’च्या निमित्ताने आयोजित एक दिवसीय ऑनलाईन वेबिनारमध्ये त्या प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होत्या.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ.युवराज सारणीकर होते.याप्रसंगी वेबिनार समन्वयक डॉ.रवींद्र शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
 
    अध्यक्षीय समारोप करताना डॉ.युवराज सारणीकर असे म्हणाले की,भारतीय समाजव्यवस्थेत पूर्वी स्त्रियांना शिक्षणाची दारे खुले नव्हती.’चूल आणि मूल ‘ हेच त्यांचे बंदिस्त कार्यक्षेत्र होते.परंतु डॉ.बाबासाहेब आंबेडकर,महात्मा फुले,सावित्रीबाई फुले,राजर्षी शाहू महाराज अशा अनेक समाजसुधारकांच्या अथक प्रयत्न व कार्यातून स्त्रियांना शिक्षण मिळाले,त्यांचे अज्ञान नाहीसे झाले.त्या अशिक्षित,निरक्षर होत्या म्हणूनच त्यांची उपेक्षा झाली.म्हणूनच स्त्रियांनी अंधश्रद्धा न पाळता शिक्षण घेतले पाहिजे.लहान मुलांवर चांगले संस्कार करून सम्राट अशोक, छत्रपती शिवाजी महाराजांसारखे सुपुत्र घडविले पाहिजेत,असे ते म्हणाले.
      ‌ प्रमुख पाहुण्यांचा परिचय व प्रास्ताविक डॉ.रवींद्र शिंदे यांनी केले तर आभार प्रा.मनीषा मुंढे यांनी मानले.सूत्रसंचालन प्रा.भाग्यश्री काळे यांनी केले.सदरील वेबिनारसाठी प्राचार्य डॉ.जयप्रकाश दरगड व उपप्राचार्य डॉ.एस.एस.बेल्लाळे यांचे मार्गदर्शन लाभले.याप्रसंगी डॉ.नंदिनी कोरडे,डॉ.जमन अंगुलवार,डॉ.आण्णाराव चौगुले, डॉ.श्रेयस माहुरकर,प्रा.राहुल जाधव,डॉ.श्याम इबाते,प्रा.बी.डी. कमाले,डॉ.रामशेट्टी शेटकार,डॉ. तांबोळी,महेश आकिनगीरे,रामराजे काळे,चेतन पाटील आदिंसह प्राध्यापक,शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
लातूर : येथील दयानंद विज्ञान महाविद्यालयात 26 नोव्हे हा दिवस भारतीय संविधान दिन म्हणून साजरा करण्यात आला.यावेळी पर्यवेक्षक डॉ.मिलिंद माने यांच्यासह संविधान उद्येशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले आणि 26/11 च्या शहीद जवानांनाही श्रद्धांजली वाहण्यात आली.
 
      याप्रसंगी उपप्राचार्य डॉ.दिलीप जगताप,प्रा.हेमंत वरुडकर,प्रा.सदाफुले निशिकांत,प्रा.अमोल सांजेकर,प्रा.किशोर पानसे,प्रा.पवार,प्रा.शेख, प्रा.लोहिया,प्रा.जोशी,
प्रा.तांबाळकर,प्रा.बिडवे,प्रा.बळवंत सूर्यवंशी,प्रा.पाटील,प्रा.अंकुशे,
प्रा.कदम,प्रा.गरड,प्रा.ब्रिजेश,प्रा.अन्वर बाशा आदि प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
लातूर : येथील दयानंद विज्ञान महाविद्यालयातील भाषा विभाग,कार्यालय आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने 26 नोव्हेंबर हा दिवस भारतीय संविधान दिन म्हणून साजरा करण्यात आला.यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयप्रकाश दरगड यांनी भारतीय संविधानावर प्रकाशझोत टाकणाऱ्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
       याप्रसंगी भाषा विभागातील प्रा.मेघा पंडित,डॉ.गजानन बने, डॉ.रामशेट्टी शेटकार,रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ.श्रेयस माहुरकर,पर्यवेक्षक डॉ.मिलिंद माने,सुधीर तिवारी,संजय तिवारी, बी.जी.कांबळे,सुनील खडबडे, किशोर जाधव,प्रदीप जावळे,प्रा. नवनाथ ढेकणे,सुमित अपसिंगेकर,सुदामा सातपुते,शंकर सूर्यवंशी,बाबा बचाटे,लक्ष्मीकांत जोशी,महालिंग माळगे,शशिकांत गर्जे,सुरवसे सुवर्णा आदींसह प्राध्यापक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
लातूर : येथील दयानंद विज्ञान महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागातील डॉ.श्रेयस श्रीधरराव माहुरकर यांना नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने रसायनशास्त्र या विषयातील पीएच.डी.चे मार्गदर्शक म्हणून नुकतीच मान्यता दिलेली आहे.त्यांचे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर एकूण नऊ शोधनिबंध प्रकाशित आहेत.
      त्याबद्दल दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी,उपाध्यक्ष अरविंदराव सोनवणे,सचिव रमेश बियाणी,संयुक्त सचिव सुरेश जैन, प्राचार्य डॉ.जयप्रकाश दरगड, उपप्राचार्य डॉ.एस.एस.बेल्लाळे, विभाग प्रमुख डॉ.युवराज सारणीकर,डॉ.जमन अंगुलवार,डॉ.रवींद्र शिंदे,डॉ.नंदिनी कोरडे,डॉ.श्याम इबाते,डॉ.आण्णाराव चौगुले,प्रा.राहुल जाधव,डॉ.रवींद्र सोळुंके,डॉ.चंद्रशेखर स्वामी,डॉ.ललीत ठाकरे,डॉ.राहुल मोरे,डॉ.गजानन बने,प्रा.मेघा पंडित,डॉ.रामशेट्टी शेटकार,प्रा.किरण भिसे,डॉ.विश्वनाथ मोटे,प्रा.श्वेता लोखंडे,डॉ.रोहिणी शिंदे,प्रा.शिवाजी आळणे,डॉ.रत्ना कीर्तने,डॉ.महेश बेंबडे,डॉ.विजेंद्र चौधरी,डॉ.कोमल गोमारे,प्रा.श्वेता मदने,डॉ.मनीषा गुरमे,प्रा.बी.डी.कमाले,प्रा.नवनाथ ढेकणे,प्रा.अक्षता माने,प्रा.मनीषा मुंढे,प्रा.भाग्यश्री काळे आदी प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले.
दयानंद विज्ञान महाविद्यालयात ‘ कौमी एकता सप्ताह ‘ निमित्त एक दिवसीय ऑनलाईन वेबिनार
 
 लातूर : भारतीय संस्कृती ही जगाच्या पाठीवरील सर्वश्रेष्ठ संस्कृती आहे.येथे जात,धर्म,वंश,भाषा,प्रांत यामध्ये विविधता असूनही एकता आहे.अशा या सांस्कृतिक एकात्मतेची जोपासना व त्याचे संवर्धन करण्याची गरज आहे.कारण आज जागतिकीकरण,आधुनिकीकरण आणि पाश्चिमात्य संस्कृतीचा प्रभाव यामुळे लोकांची जीवनशैली आणि जीवनमूल्ये ही बदलत आहेत.म्हणूनच सण,वार, उत्सव,परंपरा यांची जोपासना करणे गरजेचे आहे.वारकरी महानुभाव,दत्त,वीरशैव अशा विविधांगी संप्रदायातील चांगले विचार आत्मसात करण्याची गरज आहे,असे प्रतिपादन सारंग हिप्परगेकर यांनी केले.
 
        येथील दयानंद विज्ञान महाविद्यालयात 19 ते 25 नोव्हेंबर 2021′ कौमी सप्ताहा’च्या निमित्ताने सांस्कृतिक एकात्मता या विषयावर एक दिवसीय ऑनलाईन वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.एस.एस.बेल्लाळे होते.याप्रसंगी रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ.युवराज सारणीकर,वेबिनार समन्वयक डॉ.रवींद्र शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
 
     अध्यक्षीय समारोप करताना उपप्राचार्य डॉ.एस.एस.बेल्लाळे असे म्हणाले की,भारताची सांस्कृतिक एकात्मता ही आदर्श असून राष्ट्रीय एकात्मता आणि अखंडतेसाठी प्रत्येक भारतीय नागरिकांनी नेहमी अग्रेसर राहिले पाहिजे.काळ कितीही बदलला असला तरी पाश्चिमात्य संस्कृती व प्रसारमाध्यमांच्या झंझावातातही  संस्कृतीचे संवर्धन करण्यावर भर दिला पाहिजे.त्याचबरोबर भारतीयांच्या एकतेवर भर देणारे आणि एकात्मता संबंधाची भारतीय परंपरा जोपासणारे सांस्कृतिक कार्यक्रम घेतले पाहिजेत,असे ते म्हणाले.
 
      प्रमुख पाहुण्यांचा परिचय व प्रास्ताविक डॉ.रवींद्र शिंदे यांनी केले तर आभार प्रा.अक्षता माने यांनी मानले.सूत्रसंचालन प्रा.मनीषा मुंडे यांनी केले.सदरील वेबिनारसाठी प्राचार्य डॉ.जयप्रकाश दरगड यांचे मार्गदर्शन लाभले.याप्रसंगी डॉ.नंदिनी कोरडे,डॉ.जमन अनगुलवार,डॉ.आण्णाराव चौगुले,डॉ.श्रेयस माहुरकर, प्रा.राहुल जाधव,डॉ.श्याम इबाते, प्रा.बी.डी.कमाले,डॉ.तांबोळी,प्रा.भाग्यश्री काळे,डॉ.विजेंद्र चौधरी, डॉ.रामशेट्टी शेटकार आदि प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
लातूर : येथील दयानंद विज्ञान महाविद्यालयातील हिंदी विभाग प्रमुख डॉ.गजानन हरिराम बने यांना नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने हिंदी विषयातील पीएच.डी.चे मार्गदर्शक म्हणून नुकतीच मान्यता दिलेली आहे,ते दयानंद कला महाविद्यालयातील संशोधन केंद्राशी संलग्नित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
 
    त्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयप्रकाश दरगड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.याप्रसंगी उपप्राचार्य डॉ.एस.एस.बेल्लाळे,इंग्रजी विभाग प्रमुख प्रा.मेघा पंडित,मराठी विभाग प्रमुख डॉ.रामशेट्टी शेटकार आदि उपस्थित होते.महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख,प्राध्यापक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनीही त्यांचे अभिनंदन केले.
दयानंद विज्ञान महाविद्यालयात शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी एक दिवसीय कार्यशाळा
 
 लातूर : जागतिकीकरणाच्या युगात जागतिक पातळीवर आणि समाजजीवनात वावरत असताना प्रत्येक व्यक्तींनी आर्थिक गुंतवणुकीसंदर्भात जागरुक असले पाहिजे.कारण शेअर मार्केट,मिच्युअल फंड,एनपीएस,सेबी आदींचे परिपूर्ण ज्ञान असले पाहिजे.यातूनच आपणास आर्थिक नियोजन करता येते. आर्थिक नियोजन आणि योग्य ठिकाणी पैशाची गुंतवणूक केली तरच स्वतःचे,कुटुंबाचे भावी जीवन सुरळीत चालते,अन्यथा आर्थिक संकटाला सामोरे जावे लागते.म्हणूनच पैशाची गुंतवणूक करत असताना कोणाकडूनही फसवणूक होणार नाही याची परिपूर्ण काळजी घेतली पाहिजे.सरळव्याज,चक्रवाढव्याज यांचे ज्ञान असले पाहिजे.शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि नोकरदारांना सेबीच्या माध्यमातून गुंतवणुकीसंदर्भात परिपूर्ण ज्ञानाची आवश्यकता आहे,असे प्रतिपादन सेबी आरपीचे डॉ.ब्रिजमोहन दायमा यांनी केले.
 
        येथील दयानंद विज्ञान महाविद्यालयातील युवती कल्याण मंडळ आणि सेबी व आयएसओसीओ यांच्या संयुक्त विद्यमाने 22 ते 28 नोव्हेंबर 2021 या ‘ जागतिक गुंतवणूक सप्ताहा’ च्या निमित्ताने ‘ कार्यकारणीसाठी आर्थिक शिक्षण ‘ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी ते साधन व्यक्ती व प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयप्रकाश दरगड होते.याप्रसंगी प्रमुख पाहुणे डॉ.सारिका दायमा,उपप्राचार्य डॉ.एस.एस.बेल्लाळे,कार्यशाळा समन्वयक प्रा.शितल पाटील व प्रा.श्वेता लोखंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
 
       प्रमुख पाहुणे डॉ.सारिका दायमा यांनीही पैसा हे जीवन जगण्याचे महत्वपूर्ण साधन असून आर्थिक गुंतवणूक करत असताना अल्प कालावधीत जास्त पैसा मिळविण्याच्या  मोहाला कधीही बळी पडू नये.कारण या जगात वेगवेगळ्या स्कीमच्या नावाखाली ऑनलाईन, ऑफलाईन अशा कोणत्याही पद्धतीने फसवणूक होऊ शकते. म्हणूनच सोशल मीडिया, लॉटरीच्या स्कीम आदि संदर्भात सावध असले पाहिजे.डेबिट,क्रेडिट कार्ड,बँक अकाऊंट यांचा पासवर्ड कोणालाही सांगू नये.राष्ट्रीयकृत बँक,सुरक्षित ठिकाणीच गुंतवणूक केली पाहिजे.सेबी हे भांडवल बाजाराचे नियमन करते,त्याचे ज्ञान असले पाहिजे,असे त्या म्हणाल्या.
 
          प्राचार्य डॉ.जयप्रकाश दरगड अध्यक्षीय समारोप करताना म्हणाले की,युवती कल्याण मंडळ व सेबीच्या माध्यमातून शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी आयोजित केलेली ही कार्यशाळा नावीन्यपूर्ण अशी आहे.अशा या कार्यशाळेतूनच शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी,नोकरदार वर्ग आणि सर्वसामान्य माणूस हा देखील गुंतवणुकीसंदर्भात साक्षर होतो.त्यांना वर्तमान आणि भविष्यकालीन जीवनात आर्थिक गुंतवणुकीची माहिती मिळते.योग्य गुंतवणूक केली तरच अन्न,वस्त्र,निवारा,आरोग्य आणि शिक्षण अशा मूलभूत गरजांचा प्रश्न सहजच सोडवता येतो.म्हणूनच मुलांचे भविष्य,वाढती महागाई आणि कुटुंबाचा विचार करून किमान  50 टक्के तरी रक्कम गुंतवणूक केली पाहिजे.ही गुंतवणूक शेअर मार्केट,राष्ट्रीयकृत बँक,एफडी,मिच्युअल फंड आदि माध्यमातून केली पाहिजे.
 
       प्रास्ताविक प्रा.शितल पाटील यांनी केले तर आभार प्रा.श्वेता लोखंडे यांनी मानले.सूत्रसंचालन प्रा.पूजा सोनसाळे यांनी केले.यावेळी ‘ वित्तीय शिक्षा पुस्तिके ‘ चे प्रकाशनही करण्यात आले.याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख,प्राध्यापक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
 
 
 

All teaching and non teaching Staff, here by informed that on the occasion of World Investors Week – 2021 Celebration, Dayanand Science College (Yuwati Kalyan Mandal), in collaboration with SEBI and ISOCO is organising one day Workshop On ” Financial Education For Executives” On Monday i.e. on 22/11/21 at 4.00 pm in college seminar Hall.
Resource person –
1) Dr. Sarika Dayama RP, SEBI,
2) Dr. Brijmohan Dayama Associate Professor, DCCL and RP SEBI
President –
3) Dr Jaiprakash Dargad, Principal DSCL
Special Presence –
4) Dr S S Bellale, Vice Principal, IQAC Coordinator

All the teaching and non teaching staffs of DSCL are cordially invited to join above workshop for gaining valuable knowledge about investment & it’s protection. You are also have interaction with the resource persons. Please come and participate for the success.

Coordinator of Workshop

Prof. Shital Patil
Dr Shweta Lokhande
Yuwati Kalyan Mand, DSCL

 
दयानंद विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयप्रकाश दरगड,प्राध्यापक व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार 
 
बी.एस्सी.पदवीमध्ये कराड राधिका विद्यापीठात सर्वद्वितीय तर ढगे जान्हवी सर्वतृतीय 
 
एम.एस्सी.पदव्युत्तर सूक्ष्मजीवशास्त्र विषयांमध्ये  देशमुख दिपाली विद्यापीठात सर्वप्रथम तर देशमुख रूपाली सर्वतृतीय 
 
लातूर : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ,नांदेड अंतर्गत घेण्यात आलेल्या उन्हाळी- 2021 परीक्षेमध्ये पदवी व पदव्युत्तर स्तरावर लातूर येथील दयानंद विज्ञान महाविद्यालयातील बी.एस्सी.तृतीय वर्षाची कराड राधिका प्रकाश हिने 92.37 टक्के गुण घेऊन विद्यापीठात सर्वद्वितीय आली तर ढगे जान्हवी बापूराव हिने 92.17 टक्के गुण घेऊन सर्वतृतीय आली.याशिवाय एम.एस्सी.सूक्ष्मजीवशास्त्र द्वितीय वर्षाची देशमुख दिपाली अण्णासाहेब हिने 88.16 टक्के गुण घेऊन विद्यापीठात सर्वप्रथम आली तर देशमुख रूपाली अण्णासाहेब हिने 86.96 टक्के गुण घेऊन सर्वतृतीय क्रमांक मिळविला.या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयप्रकाश दरगड यांनी दयानंद विज्ञान महाविद्यालयातील प्राध्यापकांनी विद्यार्थी केंद्रबिंदू मानून केलेले अध्यापन आणि विद्यार्थ्यांनी चिकाटीने केलेले अध्ययन यामुळेच महाविद्यालयाने पदवी व पदव्युत्तर स्तरावर गुणवत्तेची परंपरा कायम राखली आहे,ही आमच्यासाठी,दयानंद शिक्षण संस्थेसाठी अभिमानाची गोष्ट आहे,असे सांगितले.
     
      याचबरोबर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयप्रकाश दरगड यांची सोलापूर येथील स्वायत्त वालचंद महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विषयाचे बीओएस सदस्य म्हणून नुकतीच निवड झाली आहे आणि त्यांना लातूर वृत्तपत्र समूहाच्या वतीने ज्ञानरत्न पुरस्कारही प्राप्त झालेला आहे.डॉ.विश्वनाथ मोटे यांना 2021चा वर्ल्ड सायन्स फादर ऑर्गनायझेशनतर्फे नवीन विज्ञान आविष्कार सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय संशोधन पुरस्कार मिळालेला आहे.डॉ.कोमल गोमारे यांची महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने करियर कट्टयाचे जिल्हा समन्वयक म्हणून नियुक्ती झालेली आहे.डॉ.श्रेयस माहुरकर यांना स्वाराती मराठवाडा विद्यापीठ,नांदेड अंतर्गत रसायनशास्त्र विषयाचे पीएच.डी.चे मार्गदर्शक म्हणून नुकतीच मान्यता मिळालेली आहे.सूक्ष्मजीवशास्त्राचे विद्यार्थी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीमध्ये आल्यामुळे विभाग प्रमुख डॉ.राहुल मोरे यांचेही कौतुक करण्यात आले.प्रा.श्वेता मदने यांना मायक्रोबायोलॉजिस्ट सोसायटी इंडिया यांच्याद्वारे आयोजित राष्ट्रीय स्तरावरील वैद्यानिक कॅलेंडर मेकिंग स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस मिळालेले आहे.
 
    त्यांच्या या यशस्वी कार्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयप्रकाश दरगड यांचा,प्राध्यापक आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी,उपाध्यक्ष अरविंदराव सोनवणे,सचिव रमेश बियाणी,संयुक्त सचिव सुरेश जैन,  श्री.विशालजी लाहोटी,श्री.प्रणवजी कोरे,श्री.कुणालजी शाहा,माजी प्राचार्य आर.एच.लड्डा या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.प्रथम,द्वितीय आणि तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांना अनुक्रमे दहा हजार, सात हजार,पाच हजार रोख रक्कम रुपये दयानंद शिक्षण संस्थेतर्फे देण्यात आले.या सत्कार समारंभ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.मेघा पंडित यांनी केले.याप्रसंगी उपप्राचार्य डॉ.एस.एस.बेल्लाळे,डॉ.युवराज सारणीकर,डॉ.चंद्रशेखर स्वामी, डॉ.ललित ठाकरे,प्रा.राहुल जाधव,डॉ.रामशेट्टी शेटकार आदि प्राध्यापक,पालक,शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते,त्यांनीही त्यांचे अभिनंदन व कौतुक केले.
 



दयानंद विज्ञान महाविद्यालयात ‘ जैवतंत्रज्ञान : आज आणि उद्या ‘ या विषयावर एक दिवसीय ऑनलाईन वेबिनार
 
लातूर : करोना महामारीच्या जागतिक संकट काळात विशेषतः जैवतंञज्ञान व सूक्ष्मजीवशास्त्र शाखांचे महत्त्व अधिकच प्रभावी बनले आहे.ॲनिमल व प्लॅट पॅथॉलॉजी,ॲनाटाॅमी,आहारशास्त्र, मेडिकल टेक्नोलॉजी, फॉर्माकाॅलाजी या शाखांमध्येसुद्धा जैवतंत्रज्ञानाची व्याप्ती वाढत आहे.त्यामुळे बायोटेक्नॉलॉजीचा संदर्भ घेतल्याशिवाय पुढे जाता येत नाही.फिशरी सायन्स,फुड प्रोसेसिंग व इतर शाखांमध्येही बायोटेक्नॉलॉजीचा वापर केला जातो.मानवी जीवन,प्राणी, वनस्पती या जीवसृष्टीवर होणारा परिणाम ओळखणे व त्याचे उपाय म्हणून लागणाऱ्या आवश्यक संशोधनामध्येही जैवतंत्रज्ञान हे अत्यावश्यक क्षेत्र बनले आहे.भविष्यकाळातील संधी व तंत्रज्ञानाची जलद उत्क्रांती,जीन थेरपी या सर्व प्रगत क्षेत्र व त्यात जैवतंत्रज्ञानाचा वापर नवीन मार्गांनी करून 2025 पर्यंत अतिआवश्यक शाखांमध्ये हे तंत्रज्ञान विकसित झालेले असेल,असे प्रतिपादन  पुणे येथील रेड ॲन्ड ब्लू ॲक्वाबिओ सोल्यूशनचे डायरेक्टर डाॅ. विश्वास शेंबेकर यांनी केले.
 
     येथील दयानंद विज्ञान महाविद्यालयात जैवतंत्रज्ञान व सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या वतीने पंडित जवाहरलाल नेहरू यांचा 14 नोव्हेंबर हा जन्मदिवस ‘जैवतंत्रज्ञान दिवस ‘ व ‘ बालदिन ‘ म्हणून साजरा करण्यात आला. या जन्मदिनाच्या निमित्ताने ‘ जैवतंत्रज्ञान : आज आणि उद्या ‘ या विषयावर एक दिवसीय ऑनलाईन वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.वेबिनारच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयप्रकाश दरगड होते.याप्रसंगी जैवतंत्रज्ञान व सूक्ष्मजीवशास्त्र विभाग प्रमुख डॉ.राहुल मोरे,वेबिनार समन्वयक डॉ.कोमल गोमारे,सहसमन्वयक प्रा.श्वेता मदने यांची प्रमुख उपस्थिती होती.
 
  अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ.जयप्रकाश दरगड यांनी जैवतंत्रज्ञान हा अत्यंत महत्त्वपूर्ण विषय असून या विषयाचे अद्ययावत सखोल ज्ञान विद्यार्थी व प्राध्यापक यांना व्हावे आणि विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल व्हावे अशा या उद्देशातून या प्रेरणादायी,मार्गदर्शक आणि दिशादर्शक वेबिनारचे आयोजन करण्यात आले.अशा या वेबिनारमधूनच विद्यार्थी घडतात असे त्यांनी सांगितले.
  
   प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्याचा परिचय डॉ.कोमल गोमारे यांनी करून दिले तर सूत्रसंचालन व आभार प्रा.श्वेता मदने यांनी मानले.याप्रसंगी डाॅ.महेश कराळे, डाॅ.विशाखा,प्रा.शर्मा,डॉ.रामशेट्टी शेटकार,अवंती बिडकर आदि प्राध्यापक,विद्यार्थी आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
 
 
स्त्रियांनी जीवनाची वाटचाल करताना समाजसुधारकांचा आदर्श आणि प्रेरणा घ्यावी
 
– प्राचार्य डॉ.पुनम नाथानी
 
दयानंद विज्ञान महाविद्यालयात ‘ महिला सक्षमीकरण ‘ या विषयावर एक दिवसीय ऑनलाईन कार्यशाळा
 
 लातूर : आज एकविसाव्या शतकात जागतिक पातळीवर प्रत्येक क्षेत्रात परिवर्तन होत आहे.या परिवर्तनाच्या युगात स्त्रियांनी पुरुषप्रधान संस्कृतीत जीवनाची वाटचाल करताना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर,सिंधुताई सपकाळ,मलाला युसुफझाई, सावित्रीबाई फुले,राजमाता जिजाऊ अशा थोर स्त्रियांचा आदर्श व प्रेरणा घेऊन आणि त्यांचे विचार नेहमी कृतीत उतरावून जीवनाची वाटचाल करावी.आज काळ कितीही बदलला असला तरीही स्त्रियांच्या जीवनात अनेक संकटे येत आहेत,त्यांच्यावर अन्याय-अत्याचार होतच आहेत.अशा या परिस्थितीत महिला सक्षमीकरणासाठी आणखीन प्रयत्न केले पाहिजेत.स्त्री संघटन,स्वावलंबन,स्त्री जाणीवजागृती झाली पाहिजे.स्त्रीविषयक कायद्याचे ज्ञान घेऊन परिवर्तन करताना महिलांनी नेहमी समाजसुधारकांच्या पावलांवर पाऊल टाकत जीवनाची वाटचाल केली पाहिजे,असे प्रतिपादन लातूर येथील दयानंद विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.पुनम नाथानी यांनी केले.
 
 येथील दयानंद विज्ञान महाविद्यालयात ‘ महिला सक्षमीकरण ‘ या विषयावर एक दिवसीय ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी त्या प्रमुख पाहुणे व साधन व्यक्ती म्हणून बोलत होत्या.याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयप्रकाश दरगड, उपप्राचार्य डॉ.सिद्धेश्वर बेल्लाळे,रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ.युवराज सारणीकर,कार्यशाळा समन्वयक प्रा.बी.एस.काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
  
    अध्यक्षीय समारोप करताना उपप्राचार्य डॉ.एस.एस.बेल्लाळे यांनी स्त्री ही सृष्टीची निर्मिती आहे,त्यांचा सर्वांनीच आदर केला पाहिजे असे ते म्हणाले.
 
     कार्यशाळेचे प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा.एम.पी.मुंडे यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा.अक्षता माने यांनी  केले.प्रा.बी.एम.काळे यांनी आभार मानले.सदरिल कार्यशाळा प्राचार्य डॉ.जयप्रकाश दरगड यांच्या मार्गदर्शनातून संपन्न झाली.या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी डॉ.नंदिनी कोरडे, डॉ.जमन अनगुलवार,डॉ.रवींद्र शिंदे,डॉ.श्रेयस माहुरकर,डॉ.श्याम इबाते,प्रा.राहुल जाधव यांचेही सहकार्य लाभले.याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख,प्राध्यापक,विद्यार्थी आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
 
दयानंद विज्ञानमध्ये रासेयोतर्फे ‘ राष्ट्रीय एकता दिवस ‘ साजरा
 
 लातूर : येथील दयानंद विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना यांच्या वतीने लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा 31ऑक्टोंबर हा जन्मदिवस ‘ राष्ट्रीय एकता दिवस ‘ म्हणून साजरा करण्यात आला.याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.एस.एस.बेल्लाळे यांनी देशाचे माजी गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.यावेळी सर्वांनी राष्ट्रीय एकतेची शपथ घेतली.
 
    याप्रसंगी रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ .श्रेयस माहुरकर व प्रा.राहुल जाधव,डॉ.युवराज सारणीकर,डॉ.आण्णाराव चौगुले,डॉ.जमन अनगुलवार आदिसह प्राध्यापक,रासेयो स्वंयसेवक विद्यार्थी रामराजे काळे,पृथ्वी सोनवणे,चेतन घोडके,आरती मोटेगावकर व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
 
 
 
दयानंद विज्ञान महाविद्यालयात ‘ राष्ट्रीय संकल्प दिवस ‘ आणि ‘ राष्ट्रीय एकता दिवस ‘ साजरा
 
(भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान स्व.इंदिरा गांधी यांच्या स्मृतिदिन व लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्ताने विनम्र अभिवादन )
 
 लातूर : येथील दयानंद विज्ञान महाविद्यालयातील भाषा विभाग आणि कार्यालयाच्यावतीने भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान स्व.इंदिरा गांधी यांचा  31ऑक्टोंबर हा स्मृतिदिन ‘ राष्ट्रीय संकल्प दिन ‘ व लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा 31ऑक्टोंबर हा जन्मदिवस ‘ राष्ट्रीय एकता दिवस ‘ म्हणून साजरा करण्यात आला.याप्रसंगी महाविद्यालयाचे कार्यालयीन अधीक्षक राजेश सेलूकर यांनी आयर्नलेडी इंदिरा गांधी व देशाचे माजी गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.मराठी विभाग प्रमुख डॉ.रामशेट्टी शेटकार यांच्यासमवेत सर्वांनी राष्ट्रीय एकतेची शपथ घेतली.
 
    याप्रसंगी हिंदी विभाग प्रमुख डॉ.गजानन बने,पो पट वाजपाई, गाडे,सचिन सूर्यवंशी,पाटील,केंद्रे आदिंसह प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
 
 
 
शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी बदलत्या जगानुसार संगणकाचे ज्ञान वृद्धिंगत करावे दयानंद शिक्षण संस्थेचे सचिव मा.श्री.रमेशजी बियाणी
 
लातूर : आजचे युग विज्ञानतंत्रज्ञान,संगणक आणि डिजिटल तंत्रज्ञानाचे युग आहे.या बदलत्या युगात संगणकाचे अद्ययावत ज्ञान शिक्षकेत्तर कर्मचारी आणि सर्वांनीच वृद्धिंगत करावे.बदलत्या काळानुसार जग हे संपूर्ण क्षेत्रात बदलत आहे.म्हणूनच ईमेल,फेसबुक,इंटरनेट,व्हाट्सअप, संगणक आदींचा चांगला सद्पयोग करावे.कारण ज्ञानाचे भांडार अवाढव्य असून ते ज्ञान गुगल,इंटरनेट आणि ग्रंथाच्या माध्यमातून मिळते.त्याचे परिपूर्ण ज्ञान अवगत करून शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनीच नव्हे तर प्रत्येकांनी फाईल्स तयार करणे,डेटा सेव्ह करणे,एक्सेलमधील माहिती या संदर्भातील सर्व कामे करता आली पाहिजेत.दैनंदिन व्यवहार करत असताना आणि या जागतिकीकरणाच्या युगात ऑनलाईन व्यवहार,कार्यालयीन कामकाज करताना नवनवीन संकल्पना शिकून आनंदी जीवन जगले पाहिजे,असे प्रतिपादन दयानंद शिक्षण संस्थेचे सचिव रमेश बियाणी यांनी केले.
 
      येथील दयानंद विज्ञान महाविद्यालयातील संगणकशास्त्र विभागाच्या वतीने ‘ डेव्हलपिंग डिजिटल कल्चर अमाँग नॉनटिचिंग स्टॉफ ‘ या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या पाच दिवसीय कार्यशाळेची सांगता झाली.त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयप्रकाश दरगड होते.याप्रसंगी दयानंद शिक्षण संस्थेचे संयुक्त सचिव सुरेशजी जैन,उपप्राचार्य डॉ.एस.एस. बेल्लाळे,कार्यशाळा समन्वयक व संगणकशास्त्र विभाग प्रमुख डॉ.रोहिणी शिंदे,प्रा.संगीता जाजू यांची प्रमुख उपस्थिती होती.
 
      याप्रसंगी संयुक्त सचिव सुरेशजी जैन यांनी शिक्षकेत्तर कर्मचारी व सर्वांनी डिजिटल तंत्रज्ञानाच्या युगातील संगणकाचे परिपूर्ण ज्ञान अशा कार्यशाळेतून आणि तज्ज्ञ व्यक्तीकडून शिकून घ्यावे आणि जे ज्ञान मिळवलेले आहे ते उत्स्फूर्तपणे कृतीत आणि कार्यालयीन कामकाजात उपयोगात आणावे.यातूनच स्वतःचे,कॉलेजचे आणि संस्थेचे नावलौकिक होते,असे ते म्हणाले.
 
    उपप्राचार्य डॉ.एस.एस.बेल्लाळे यांनी शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी संगणकाचे कौशल्य आत्मसात करण्याबरोबर महाविद्यालयाचे नावलौकिक व नँकचा दर्जा उंचावण्यासाठी आणि विद्यार्थी, पालकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आणि कार्यालयीन कामकाज शिस्तबद्धरित्या पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले पाहिजे, असे ते म्हणाले.
 
     अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ.जयप्रकाश दरगड यांनी शिक्षकेत्तर कर्मचारी हा प्रशासनाचा मुख्य कणा असून त्यांनी संगणक आणि इंटरनेटचे परिपूर्ण ज्ञान अवगत केले पाहिजे.याचबरोबर त्यांनी विविध ट्रेनिंग कोर्स,कार्यशाळा,एफडीपी प्रोग्राम करावे.असे कार्य दयानंद शिक्षण संस्थेतील सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी सातत्याने करतात,असे ते म्हणाले.
 
    प्रास्ताविक डॉ.रोहिणी शिंदे यांनी केले तर आभार प्रा.कांचन कदम यांनी मानले.सूत्रसंचालन प्रा.निकिता शिंदे यांनी केले. यावेळी बी.जी.कांबळे,दिलीप राठोड,सुदर्शन सर्जे,एस.व्ही.हालसे,पूजा पाटील यांनी कार्यशाळेतील पाच दिवसीय अनुभव व्यक्त केले.प्रमुख मान्यवरांच्या हस्ते कार्यशाळेतील सहभागी साधन व्यक्ती व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.याप्रसंगी नँक समन्वयक डॉ.रवींद्र सोळुंके,डॉ.युवराज सारणीकर,डॉ.ललित ठाकरे,डॉ.आण्णाराव चौगुले, कार्यालय अधीक्षक राजेश सेलूकर,संजय तिवारी,प्रा.एम.बी.सुगरे,प्रा.सुजाता काळे,प्रा.शुभांगी चिकराळे,नंदिनी जाधव,प्रियंका हिप्परकर,आर.एस.पवार,राहुल बनभेरू,चित्ते,एस.एम.सूर्यवंशी,अमोलवाजपाई,भालेराव,नागटिळक,
माळगे आदींसह प्राध्यापक,शिक्षकेत्तर कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.
 
 
Skip to content